** आमचे गाव, आमची माणसं **
" घरगूती मैत्रीची माणसं..!"
_________________________________________________
प्रेम,सहकार्य,जिव्हाळा ,विश्वास इ.उच्च कोटीची मूल्ये " मित्र " या नात्यात निसर्ग अलगदपणे पाठवून देत असतो..!अशी मूल्ये लाभलेली मित्र व मैत्री लाभणे हा निसर्गदत्त प्रसादच म्हणावा..!
माझ्या बालमैत्रीतील शिरपेचातील कोंदणात ठेवावे असे हे दोन बालमित्र-डॉ.संजय राऊत व डॉ.गणेश वाणी( cap घातलेला)..!आज मी जो काही आहे,त्या माझ्या असण्यासाठीच्या आयुष्यात अनेक मित्रांपैकी या दोन मित्रांचे अमूल्य योगदान आहे..!
डॉ.गणेश वाणी,हा अतिशय शांत,संयमी व मेहनती मित्र..!आम्ही एकाच अभ्यासिकेत ( मातीच्या घरात) पालखेड येथे इ.५ वी ते १० पर्यंतचा खूप अभ्यास केला..!माझ्या आजपर्यंतच्या कौटुंबिक आयुष्यात गणेशाचे खूप योगदान आहे.आमच्या सर्व मित्रांमध्ये आम्ही समविचारी मित्र आहोत.विश्वास व हक्काने त्रास देणारी मैत्री आमची..!माझ्या पडत्या काळात गणेशने नेहमी दीपस्तंभ म्हणून भूमिका निभावली..!ज्यावेळी माझा पहिला मुलगा चि.नमन चा जन्म झाला त्यावेळी,केवळ मैत्रीखातर पालखेड हून माझ्या दूर असलेल्या सासुरवाडीला मैत्रीपूर्ण भेट देण्यासाठी धावत येणारा मित्र..!माझ्या आईची आजारपणात सेवा करणारा मित्र..!माझ्या वडिलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असणारा मित्र..! माझ्या तीर्थरूप वडिलांचे मित्र होणे सोपी गोष्ट नाही,हे त्यांचं स्वभाव ज्यांना माहीत आहे त्यांना चांगले माहित आहे,खूप तत्वनिष्ठ स्वभाव माझ्या वडिलांचा..! पण विजू गायकवाड व डॉ.गणेश पा. वाणी यांना ते कसब जमले आहे..! थोडक्यात आज मी,जो काही उभा आहे,त्या माझ्या उभा असण्याला खूप मोठे निमित्त आहे..गणेश जगन्नाथराव पा. वाणी..!
दुसरा अतिशय प्रिय मित्र डॉ.संजय राऊत..! औरंगाबाद येथे राहून कमवा व शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ब्रीद वाक्याचे सर्वोत्तम उदाहरण..! माझ्या या मित्राने किती खडतर परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेतले हे खूपच प्रेरणादायक आहे. संजू सोबतची मैत्री किती घट्ट आहे, हे सांगण्यासाठी एकच उदा.पुरेसे आहे.याच्या सोबतच मी माझे पहिले आणि अंतिम विवाहस्थळ पाहायला याच्या सोबत गेलो, तेंव्हा यानेच माझे लग्न जमविले,संजूच्याच हस्ते माझ्या लग्नाच्यारोजीचा " साखरपुडा " विधी पार पडला..!माझ्या कुटुंबातील एक सदस्य या अधिकारवाणीने समजून आजतागायत मला खूप खूप प्रेम,सहकार्य ,जिव्हाळा संजुकडून मिळालेला आहे..!माझ्या सुखी संसारात संजू ,एक भाग्यवान मित्र म्हणून आमच्या कुटुंबात सदैव असेल..! आम्ही दोघेही स्वयंसेवक आहोत..!
अशी ही बनवाबनवी या सर्वोत्तम मराठी चित्रपटातील जे एक मित्रांचे उदाहरण आहे,ते आमच्यासाठी याच माझ्या अतिशय जिवलग मित्राने डॉ.संजय राऊत याने माझ्यासाठी इ.स.१९९७ साली औरंगाबाद येथे केलेले आहे..!☺ त्यावर जर लेख लिहायचा असेल तर तो या माझ्या मित्राला विचारून नक्की वाचकांसाठी लिहिल..!
या मित्राचा जनसंपर्क खूप दांडगा, त्यामुळे नेहमी,संजूच्यासोबत ,त्याच्या ओळखीच्या लग्न समारंभाला जाणे होते..!वास्तविक मला अजिबात निमंत्रण नसते..!पण केवळ मित्राच्या मैत्री खातिर जातो..! यात मला कधीच कमीपणा वाटला नाही आणि वाटणार देखील नाही...! विशेषकरून राजपूत समाजाच्या लग्नास गेलो की,शामभाऊ राजपूत,हमखास म्हणतात..." का,हो डॉक्टर,नंदन नाही आला का...?" किंवा बरेच जन अंदाज लावतात की,ही व्यक्ती(मी) डॉ. राऊत सोबत आलेली आहे..!मी पण मग निमंत्रण नसलेला मान,सन्मान घेत,बऱ्याच विवाहसोहळ्यात मित्रासाठी स्वतःला मिरवत असतो..!
असे आम्ही प्रिय बालमित्र , व आमची घरगुती मैत्री..! मित्र व मैत्री जपणारी अनेक उदाहरणे आमच्या गावात होती अन् आहेत..!
वंदे मातरम्
ता.क. - आज दिनांक १४ सप्टेंबर २०१७ रोजी आम्ही, पित्रा निमित्त चापून,चोपून कढी,खीर,वड्या रश्शीवर ताव मारला..!विशेष म्हणजे कढी मस्तपैकी गरम,गरम पिलो..!☺
लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १४ सप्टेंबर २०१७
स्थळ: लासूर स्टेशन
" घरगूती मैत्रीची माणसं..!"
प्रेम,सहकार्य,जिव्हाळा ,विश्वास इ.उच्च कोटीची मूल्ये " मित्र " या नात्यात निसर्ग अलगदपणे पाठवून देत असतो..!अशी मूल्ये लाभलेली मित्र व मैत्री लाभणे हा निसर्गदत्त प्रसादच म्हणावा..!
माझ्या बालमैत्रीतील शिरपेचातील कोंदणात ठेवावे असे हे दोन बालमित्र-डॉ.संजय राऊत व डॉ.गणेश वाणी( cap घातलेला)..!आज मी जो काही आहे,त्या माझ्या असण्यासाठीच्या आयुष्यात अनेक मित्रांपैकी या दोन मित्रांचे अमूल्य योगदान आहे..!
डॉ.गणेश वाणी,हा अतिशय शांत,संयमी व मेहनती मित्र..!आम्ही एकाच अभ्यासिकेत ( मातीच्या घरात) पालखेड येथे इ.५ वी ते १० पर्यंतचा खूप अभ्यास केला..!माझ्या आजपर्यंतच्या कौटुंबिक आयुष्यात गणेशाचे खूप योगदान आहे.आमच्या सर्व मित्रांमध्ये आम्ही समविचारी मित्र आहोत.विश्वास व हक्काने त्रास देणारी मैत्री आमची..!माझ्या पडत्या काळात गणेशने नेहमी दीपस्तंभ म्हणून भूमिका निभावली..!ज्यावेळी माझा पहिला मुलगा चि.नमन चा जन्म झाला त्यावेळी,केवळ मैत्रीखातर पालखेड हून माझ्या दूर असलेल्या सासुरवाडीला मैत्रीपूर्ण भेट देण्यासाठी धावत येणारा मित्र..!माझ्या आईची आजारपणात सेवा करणारा मित्र..!माझ्या वडिलांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून असणारा मित्र..! माझ्या तीर्थरूप वडिलांचे मित्र होणे सोपी गोष्ट नाही,हे त्यांचं स्वभाव ज्यांना माहीत आहे त्यांना चांगले माहित आहे,खूप तत्वनिष्ठ स्वभाव माझ्या वडिलांचा..! पण विजू गायकवाड व डॉ.गणेश पा. वाणी यांना ते कसब जमले आहे..! थोडक्यात आज मी,जो काही उभा आहे,त्या माझ्या उभा असण्याला खूप मोठे निमित्त आहे..गणेश जगन्नाथराव पा. वाणी..!
दुसरा अतिशय प्रिय मित्र डॉ.संजय राऊत..! औरंगाबाद येथे राहून कमवा व शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ब्रीद वाक्याचे सर्वोत्तम उदाहरण..! माझ्या या मित्राने किती खडतर परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण घेतले हे खूपच प्रेरणादायक आहे. संजू सोबतची मैत्री किती घट्ट आहे, हे सांगण्यासाठी एकच उदा.पुरेसे आहे.याच्या सोबतच मी माझे पहिले आणि अंतिम विवाहस्थळ पाहायला याच्या सोबत गेलो, तेंव्हा यानेच माझे लग्न जमविले,संजूच्याच हस्ते माझ्या लग्नाच्यारोजीचा " साखरपुडा " विधी पार पडला..!माझ्या कुटुंबातील एक सदस्य या अधिकारवाणीने समजून आजतागायत मला खूप खूप प्रेम,सहकार्य ,जिव्हाळा संजुकडून मिळालेला आहे..!माझ्या सुखी संसारात संजू ,एक भाग्यवान मित्र म्हणून आमच्या कुटुंबात सदैव असेल..! आम्ही दोघेही स्वयंसेवक आहोत..!
अशी ही बनवाबनवी या सर्वोत्तम मराठी चित्रपटातील जे एक मित्रांचे उदाहरण आहे,ते आमच्यासाठी याच माझ्या अतिशय जिवलग मित्राने डॉ.संजय राऊत याने माझ्यासाठी इ.स.१९९७ साली औरंगाबाद येथे केलेले आहे..!☺ त्यावर जर लेख लिहायचा असेल तर तो या माझ्या मित्राला विचारून नक्की वाचकांसाठी लिहिल..!
या मित्राचा जनसंपर्क खूप दांडगा, त्यामुळे नेहमी,संजूच्यासोबत ,त्याच्या ओळखीच्या लग्न समारंभाला जाणे होते..!वास्तविक मला अजिबात निमंत्रण नसते..!पण केवळ मित्राच्या मैत्री खातिर जातो..! यात मला कधीच कमीपणा वाटला नाही आणि वाटणार देखील नाही...! विशेषकरून राजपूत समाजाच्या लग्नास गेलो की,शामभाऊ राजपूत,हमखास म्हणतात..." का,हो डॉक्टर,नंदन नाही आला का...?" किंवा बरेच जन अंदाज लावतात की,ही व्यक्ती(मी) डॉ. राऊत सोबत आलेली आहे..!मी पण मग निमंत्रण नसलेला मान,सन्मान घेत,बऱ्याच विवाहसोहळ्यात मित्रासाठी स्वतःला मिरवत असतो..!
असे आम्ही प्रिय बालमित्र , व आमची घरगुती मैत्री..! मित्र व मैत्री जपणारी अनेक उदाहरणे आमच्या गावात होती अन् आहेत..!
वंदे मातरम्
ता.क. - आज दिनांक १४ सप्टेंबर २०१७ रोजी आम्ही, पित्रा निमित्त चापून,चोपून कढी,खीर,वड्या रश्शीवर ताव मारला..!विशेष म्हणजे कढी मस्तपैकी गरम,गरम पिलो..!☺
लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १४ सप्टेंबर २०१७
स्थळ: लासूर स्टेशन






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा