शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९

" कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर...!"




       चिंतन **

      " कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर...!"

=====================================

चिंतन ©️

" कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर...!"

=====================================

कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर रयत शिक्षण संस्था उभी राहिली नसती..!

रयत शिक्षण संस्था उभी राहिली नसती तर..अतिशय दारिद्र्य अवस्थेतील,कुटुंबातील एक तरुण त्याचे शिक्षण घेऊ शकला नसता..!

रयत शिक्षण संस्था नसती तर स्वावलंबी जीवनाचा मूलमंत्र त्याच तरुणाने ,त्यांच्या वार्धक्यात आम्हाला दिला नसता..!

रयत शिक्षण संस्था नसती तर..आम्ही सर्वजण आज कुठेतरी रोजंदारीवर काम करत राहिलो असतो..!

आज आम्हाला जे काही थोडेफार स्थैर्य प्राप्त झाले आहे, त्यामागे कळत नकळतपणे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आशीर्वाद आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या  शिक्षण संस्थेत त्याकाळी आमच्या तीर्थरूप वडिलांची अजिबात आर्थिक कुवत नसताना, तीर्थरूप वडिलांनी कमवा व शिका अंतर्गत शिक्षण घेतले होते..!

जी व्यक्ती तुम्हाला ,तुमच्या कुटुंबाला शिक्षणाचा पहिला मार्ग दाखवते किंवा सानिध्य देते, अशाच महान व्यक्ती, अशा  कित्येक  सर्व सामान्य व्यक्तींसाठी वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतात. कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही फक्त एक व्यक्ती नसून कौटुंबिक, सामाजिक क्षमता नसताना  शिक्षण घेऊन   स्वतः ला सिध्द करणारी विचारधारा आहे . वंदनीय  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त फोटो, जयंती किंवा जयघोष करण्यापुरते मर्यादित व्यक्तिमत्त्व नाही. तर शिक्षण म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तत्त्व सर्वश्रेष्ठ आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.आमच्या कुटुंबासाठी असे महान व्यक्तिमत्व दोन अन् ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील अन् आमचे वडील तीर्थरूप विष्णुपंत चंपतराव जाधव..! 

आमच्या घरातील वटवृक्ष जे माझे वडील..तीर्थरूप विष्णुपंत चंपतराव जाधव पालखेडकर ( वय वर्ष ८२), आहेत, त्यांचे शिक्षण साठ च्या दशकात " कमवा व शिका..!" या विचाराने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत झालेले आहे.

माझ्या पत्नीचे विद्यालयीन शिक्षण देखील त्याच रयत शिक्षण संस्थेत झालेले आहे.मी नेहमी माझ्या सासुरवाडीला गेल्यावर तेथील रयत शिक्षण संस्थेच्या  शाळेत नक्कीच जातो.दर्शन  घ्यायला..रयत शिक्षण संस्थेचे..!

आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी आहे.
(९ मे १९५९) त्या निमित्त या महामानवास आमच्या कुटुंबाकडून विनम्र अभिवादन..! 🙏🏻

तसेच माझ्या वडिलांचे छायाचित्र ,त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या  श्रीरामपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीचे आहे.माझे वडील या इमारतीच्या मुख्य प्रवेश द्वार वर उभे आहेत,त्यावेळी एवढी भव्य इमारत नव्हती. मी सहपरिवार वडिलांना मुद्दामहून त्यांच्या गतकाळातील आठवणींना उजाळा देण्यासाठी श्रीरामपूर येथे  त्याच स्थळी घेऊन गेलो होतो.त्यावेळी त्या परिसरातील   गतकाळातील काही वस्तू , जुन्या इमारती इत्यादी बघून  खडतर आठवणींच्या हिंदोळ्यावर माझ्या वडिलांना खूप गहिवरून आले होते.

माझ्या दृष्टीने ,माझ्या वडिलांना त्यांचा भूतकाळ भेटीस घालून देणे त्यांच्या वर्तमानकाळात एखाद्या तीर्थक्षेत्रास गेल्या सारखे वाटले होते.

ता.क. - वर्तमानात, खडतर आयुष्याचा भूतकाळ भेटला की, मन भरून येते.

वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक: ९ मे २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा