🔵प्राचीन भारत, भाग क्रमांक -९🔵
🛑शुंग, कण्व व सातवाहन🛑
==================================
🛑शुंग वंश🛑
🔶शुंग हा भरद्वाजगोत्री प्राचीन ब्राम्हण वंश होता.
♦️पुष्यमित्र शुंग (इ.स.पू.१८५ ते इ. स.पूर्व १४९)♦️
🔘मौर्य घराण्यातील शेवटचा राजा बृहद्रथ, दुर्बल, विलासी कर्तृत्वहीन निघाल्याने मौर्य लष्कराचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने लष्करी राज्यक्रांती घडवून बृहद्रथ याला ठार करून शुंग घराण्याची सत्ता स्थापन केली.
♦️युवराज अग्नीमित्र ♦️
🔘याने आठ वर्षे राज्य केले.
♦️वसुमित्र ♦️
🔘वसुमित्र हा अग्नीमित्रचा मुलगा होता.
याने दहा वर्षे राज्य केले.
🔘यानंतर ओद्रक, पुलिंडक,वसुघोष,वज्रमित्र,भागभद्र ,देवभूमी ह्या राजांनी मगध गादीवर राज्य केले.
🔘शुंग घराण्यातील शेवटचा राजा देवभुती हा व्यसनी, नीच निघाला.
🔘त्याचा ब्राम्हण मंत्री , वसुदेव कण्व याने इ.स.पूर्व ७२ देवभुतीचा खून करवून शुंग घराण्याचा शेवट केला व मगध राज्यावर कण्व घराण्याची सत्ता स्थापन केली.
_________________________________________
🛑कण्व घराणे 🛑
♦️वसुदेव कण्व♦️
🔘याने दहा वर्षे राज्य केले.
🔘शेवटचा राजा कण्व राजा सुशर्मा याला इ. स.पूर्व २७ मध्ये एका सातवाहन राजाने ठार करून कण्व सत्तेचा शेवट केला.
मगध राज्यावर सातवाहन वर्चस्व प्रस्थापित केले.
________________________________________
🛑सातवाहन घराणे🛑
🔘सातवाहनांचा सातकर्णी व शालिवाहन असा उल्लेख आढळतो.
🔘नाशिकच्या शिलालेखात सातवाहन स्वतःचा
' एकब्राम्हण ' असल्याचा दावा मांडतात.
* ♦️सिमुक सातवाहन ♦️
( इ. स.पूर्व २३५ ते इ. स.पूर्व २१२ )
🔘हा सातवाहन घराण्याचा संस्थापक.
* ♦️कृष्ण ♦️
🔘हा सिमुक याचा भाऊ होता.
* ♦️सातकर्णी पहिला ( इ.स.पू.१९४ ते इ.स.पू.१८५ )♦️
🔘सिमुक सातवाहन याचा मुलगा.
🔘याची कारकीर्द दहा वर्षाची.
🔘खूप प्रबळ व समृध्द सत्ता.
🔘खऱ्या अर्थाने सातकर्णी पहिला हाच सातवाहन साम्राज्याचा संस्थापक होय.
🔘सातकर्णी याने पैठण ही राजधानी बनवली.
🔘मधल्या काळातील सातवाहन राजांनी माहिती मिळत नाही.
♦️गौतमीपुत्र सातकर्णी ( इ. स.१०६ ते इ. स.१३० )♦️
🔘मातृनाम लावणारा पहिला सातवाहन सम्राट.
🔘वैदिक धर्माचा जाज्वल्य अभिमानी होता.
🔘कुशल प्रशासक, प्रजाहितदक्ष सम्राट.
🔘नाशिक प्रशस्तीत गौतमीपुत्र वेदांचा आश्रयदाता आणि एक ब्राम्हण असे म्हंटले आहे.
♦️पुलुमायी उर्फ वसिष्ठीपुत्र सातकर्णी♦️
( इ.स.१३० ते १५५)
🔘हा गौतमीपुत्र सातकर्णी याचा मुलगा होता.
🔘पुलुमायी नंतर दोन सातवाहन राजे झाले.
♦️यज्ञश्री सातकर्णी ( इ.स.१६० ते इ.स.१८९ )♦️
🔘यज्ञश्री सातकर्णी हा सातवाहन घराण्यातील शेवटचा कर्तृत्ववान सम्राट होय.
🔘इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात सातवाहन सत्ता समाप्त झाली.
==================================
वंदे मातरम्..!
🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵दिनांक: १३ एप्रिल २०२०, सोमवार
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा