शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र.३१ 🔵 बंगालचे पाल व सेन घराणे 🔵



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक ३१🛑

 🔵 बंगालचे पाल व सेन घराणे 🔵

===================================

🔵 पाल घराणे 🔵

🔶 बंगालमधील सरंजामदारांनी इ.स. ७६५ च्या सुमारास गोपाल नावाच्या पराक्रमी व नेतृत्वगुण असलेल्या पुरुषाची आपला राजा म्हणून निवड केली.
🔶 गोपाल नंतर वारसा हक्काने गादीवर आलेल्यांना पाल घराणे असे म्हणतात.
🔶 पाल घराण्याने सुमारे ४०० वर्षे राज्य केले.
🔶 पाल राजे बौद्ध धर्माचे अनुयायी होते.

१)  ♦️गोपाल  ( इ. स.७६५ - ७७०)♦️

🔘 गोपाल राजाने संपूर्ण बंगाल व मगध वर आपली सत्ता स्थापन केली.
🔘 बौद्ध धर्माचा अनुयायी गोपाल याने नालंदा जवळ ओदंतपूर येथे बौद्ध विद्यापीठ स्थापन केले.
🔘 गोपाल इ. स.७७० मध्ये मरण पावला.

२) ♦️ धर्मपाल  ( इ. स.७७० ते ८१५)♦️

🔘 गोपाल याच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा धर्मपाल हा गादीवर आला.
🔘 बौद्ध धर्माचा अनुयायी धर्मपाल याने गंगेच्या काठी भागलपूर येथे विक्रमशिला बौद्ध विद्यापीठ स्थापन केले.
🔘 इ. स.८१५ मध्ये धर्मपाल याचा मृत्यू झाला.

३) ♦️  देवपाल  ( इ. स.८१५ ते ८५५)♦️

🔘 धर्मपाल यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा देवपाल गादीवर आला.हा अत्यंत पराक्रमी होता.
🔘 देवपाल याने ४० वर्षे राज्य केले.
🔘 ब्रह्मदेश, जावा,सुमात्रा या देशांशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले.

४) ♦️ नारायणपाल  (इ.स.८५५ - ९१२)♦️

🔘 देवपाल यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा नारायणपाल गादीवर आला.
🔘 नारायणपाल हा पाल घराण्यातील एकमेव शैव पंथीय राजा होता.
🔘 याने मगध,उत्तर बिहार,उत्तर बंगाल प्रदेशावर आपली सत्ता प्रस्थापित केली.

५)   ♦️राज्यपाल  ♦️

🔘 नारायणपाल यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा राज्यपाल हा गादीवर आला.

६)  ♦️महिपाल ♦️

🔘 महिपाल हा नारायणपाल याचा नातू होय.
🔘 महिपाल याच्या कारकिर्दीपासूनच पाल सत्तेचा  -हास व्हायला सुरुवात झाली.
🔘 शेवटचा पाल राजा इंद्रद्दुम्नपाल यांच्या कारकिर्दीत इ. स.११७५ मध्ये पाल सत्तेचा शेवट झाला.

🔴 बौद्ध धर्मास शेवटचा राजाश्रय पाल राजांनी दिल्यामुळे बाराव्या शतकाच्या अखेरीस पर्यंत बंगाल मध्ये बौद्ध धर्म टिकून होता.
🔴 पाल सत्तेच्या अस्ता बरोबरच बंगाल मधील बौद्ध धर्माचे सुध्दा उच्चाटन झाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔵 बंगाल मधील सेन घराणे 🔵

🔶सेन घराणे वैदिक धर्माचे संरक्षक होते.
🔶 सेन वंशाचा संस्थापक सामंतसेन आणि त्याचा मुलगा हेमंतसेन दोघेही कल्याणीच्या चालुक्यांचे सामंत होते.

♦️ विजयसेन‌ ( इ.स.१०९५ ते ११५८)♦️

🔘 हेमंतसेन यांच्या मुलाचे नाव विजयसेन‌ होय.
🔘 विजयसेन‌ पराक्रमी ,महत्वकांक्षी राजा होता.
🔘 ६४ वर्षाच्या कारकर्दीत विजयसेन‌ बंगाल प्रांतात शांतता, सुव्यवस्था ,संपन्नता व समृध्दी नांदत होती

♦️ बल्लाळसेन‌ ( इ.स.११५८ ते ११७८)♦️

🔘 विजयसेन‌ यांच्या नंतर त्याचा पुत्र  बल्लाळसेन‌ गादीवर आला.
🔘  बल्लाळसेन‌ यांच्या काळात शैव पंथाचा जोरदार प्रसार झाला.
🔘  बल्लाळसेन‌ याने 'दानसागर ' व  ' अदभुतसागर ' हे दोन ग्रंथ लिहिले.

♦️लक्ष्मणसेन  (इ.स.११७८ ते १२०५) ♦️

🔘  बल्लाळसेन‌ यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा लक्ष्मणसेन गादीवर आला.
🔘 लक्ष्मणसेन वैष्णव पंथी होता.
🔘 इ. स.१२०५ पर्यंत तो बंगालच्या छोट्याशा प्रदेशावर राज्य करत होता.विश्वरुपसेन आणि केशवसेन यांनी आपले अस्तित्व टिकवून धरले होते.त्यांच्या नंतर सेन वंश पूर्णपणे विलय पावला.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  १६ मे २०२०, शनिवार

🔴 प्राचीन भारत-
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा