शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र.३३ 🔵 महमूद गझनी आणि मुहम्मद घोरी- आक्रमणे 🔵



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक ३३ 🛑

 🔵 महमूद गझनी आणि मुहम्मद घोरी- आक्रमणे 🔵
         ===================================

♦️महमूद गझनीच्या स्वाऱ्या♦️

🔘 इ. स.९९९पर्यंत मध्य आशियात आपले स्थान स्थिर झाल्यावर महमूद गझनी याने पुढील सव्वीस वर्षात भारतावर सतरा स्वाऱ्या करून अगणित लूट लुटून आणि प्रचंड विध्वंस करून,पंजाबचा सुपीक प्रांत गझनी राज्यास जोडला.
🔘 असंख्य मंदिराची सुशोभित असलेले हजार राजवाड्याचे  असलेले मथुरा लुटले.
🔘 मथुराच्या लुटी पेक्षाही तिथला अधिक विध्वंसामूळे भारतीय संस्कृतीची पुन्हा कधी भरून न येणारी हानी झाली. भारतीय स्थापत्यकलेचे कायमचे नुकसान झाले.
🔘  मथुरेच्या पाठोपाठ ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वृंदावन चा महमूद गझनी ने विध्वंस केला.आर्थिक लुटी पेक्षाही स्थापत्यकलेचे नुकसान झाले,ते अधिक धक्कादायक व रानटीपणाचे द्दोतक होते.
🔘इ. स.१०२५ - २६ मधील सोरटी सोमनाथ  वरील स्वारी महमूद गझनीची नियोजनबध्द स्वारी होती.
🔘 अनेक शिखरांनी युक्त असलेले तेरा मजली उंच असलेले ;सोमनाथ मंदिर तत्कालीन भारतीय ऐश्र्वर्याचे प्रतीक होते.
🔘 सोमनाथचे लिंग भंग करण्यात आले.देवालयाचा विध्वंस झाला.
🔘एकट्या सोमनाथ मंदिराच्या लुटीत महमूद गझनी ला जी द्रव्य प्राप्ती झाली,तिचा शंभरावा भागही तत्कालीन कोणत्याही हिंदू राजाच्या खजिन्यात त्यावेळी नव्हता.सोमनाथ येथे महमूद गझनी पंधरा दिवस मुक्काम ठोकून होता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

♦️ मुहम्मद घोरीच्या स्वाऱ्या♦️

🔘 गझनी व हिरातच्या दरम्यान सुर टोळीच्या अधिपत्याखालील घोर राज्य, महमूद गझनी याने इ. स.१०१० मध्ये जिंकून घेतले.
🔘 इ. स.११७८ मध्ये शाहबुद्दीन मुहम्मद घोरी याने गुजराथ वर आक्रमण केले. त्यावेळी चालुक्य राणी नाइकीने अल्पवयीन पुत्र मुलराज दुसरा याला सोबत घेऊन स्वतः सैन्याचे नेतृत्व केले. अत्यंत शौर्याने शाहबुद्दीन मुहम्मद घोरी  याला माऊंट अबू जवळ झालेल्या युध्दात  पराभूत करून पिटाळून लावले.
🔘 इ. स.११९१ मध्ये मुहम्मद घोरी व पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा यांच्यात तराई येथे युद्ध झाले.यात मुहम्मद घोरी याचा पराभव झाला. या युध्दात कनोजचा गढवाल राजा जयचंद्र अलिप्त राहिला.
🔘 मुहम्मद घोरी याने पुन्हा इ. स.११९२ मध्ये पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा याच्यावर चालून आला.याही वेळेस कनोजचा गढवाल राजा जयचंद्र अलिप्त राहिला.या युध्दात पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा याचा पराभव झाला. अखेर पृथ्वीराज चाहमान ( चौहान- चव्हान ) तिसरा यांना पकडण्यात आले व त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
🔘 इ. स.११९४ मध्ये मुहम्मद घोरी याने कानोजच्या जयचंद्र राठोड वर हल्ला केला.यमुने जवळ चांद्वार या ठिकाणी दोन्ही सैन्यात धुमश्चक्री उडाली. मुहम्मद घोरी याने कानोजच्या जयचंद्र राठोडचा रणभूमी वरच शिरच्छेद केला.
🔘 या लढाई नंतर उत्तर भारतात मुहम्मद घोरी ला विरोध करणारा एकही प्रबळ राजा शिल्लक उरला नाही.
🔘 इ. स.१२०६  मध्ये  सिंधूच्या तीरावर गख्खरांनी मुहम्मद घोरीला ठार केले.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  १९ मे २०२०, मंगळवार.

🔴 प्राचीन भारत-
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा