** चिंतन **
नेमके काय...?
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन...की ,
मराठवाडा स्वातंत्र्य दिन...?
________________________________________
वास्तविक इंग्रज राजवट व मराठवाडा यांचा फारसा काही संबंध आला नाही.थोडक्यात इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा तडाखा मराठवाड्याला बसला नाही..!
पण.....
त्याहून जबर तडाखा मराठवाड्याला बसला..! तो तडाखा असा काही क्रूर होता..की त्यात कित्येक महिलांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली..! क्रूरकर्मा रझाकार व निजाम यांच्या जुलमी वृत्तीने आपल्या मराठवाड्यातील इज्जतीचा जाहीर पंचनामा झाला. बऱ्याच जणांनी विरोध केला..! गोदावरीबाई टेके सारख्या रणरागिणी लढल्या...पण शरण नाही गेल्या..त्या क्रूर रझाकरांच्या समोर..!
दरवर्षी माझ्या मनात एकच प्रश्न आजच्या रोजी येतो की,
आपण आजही काहीतरी गफलत करत तर नाही ना..?
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन... की.... मराठवाडा स्वातंत्र्य दिन...?
थोडेसे अर्थाने पाहूया....
मुक्ती या शब्दाचा अर्थ आहे..स्वातंत्र्य ...किंवा सुटका..! आणि संग्राम याचा अर्थ होतो लढा..!
मग दरवर्षी जो उल्लेख केल्या जातो.." मराठवाडा मुक्ती संग्राम दिन " याच्यातील मराठवाडा हा आपल्या भौगोलिक परिसराचा शब्द..! अन् त्याला लागून शब्द येतो..मुक्ती संग्राम...! मग आपण काय मराठवाड्याशी संग्राम करून मुक्त झालो का..?
याचे उत्तर सर्वांना मान्य आहे.." अजिबात नाही..!"
हैद्राबाद हे आज जरी एक शहर असले तरी १७ सप्टेंबर १९४८ पूर्वी ते एक स्वतंत्र संस्थान होते..! नव्हे..नव्हे तो एक स्वतंत्र देश होण्याच्या मार्गावर होता..! पण आपल्यावर खूप खूप मेहरबानी सरदार वल्लभभाई पटेल यांची..! सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अतिशय कणखर नेतृत्व गुणांनी आपण त्यारोजी निजाम राजवटी पासून स्वतंत्र्य झालो..!ते आपल्या मराठवाड्याचे
" राष्ट्रपिता " म्हंटले तरी वावगे ठरणार नाही..!
म्हणजेच त्यादिवशी मराठवाडा स्वतंत्र्य झाला..!
ताजा कलम: आपण " मराठवाडा स्वातंत्र्य दिन " म्हणणे योग्य राहील..!
" मराठवाडा स्वातंत्र्य दिनाचा विजय असो..! "
वंदे मातरम्...!
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: १७ सप्टेंबर २०२०

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा