शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

थोरवी, थोरल्या महाराजांची..!


 

चिंतन ©️


" थोरवी, थोरल्या महाराजांची..! "🙏🏻


=========================


स्वकर्तूत्व सिध्दशिरोमनी,इतिहासातील आजतागायत एकमेव चारित्र्यसंपन्न राजा..!


रानटी मूघलांना,हिदवी स्वराज्याच्या शत्रूंना त्यांची जागा दाखविणारे शौर्यशील धूरंधर..!


एका स्रीच्या ,आईच्या मार्गदर्शनाने एक मूर्तीमंत,स्वराज्यप्रेमी व्यक्तिमत्व कसे आकारास येते याचे ज्वलंत उदाहरण..!


 तळागाळातील सर्व जातीधर्माच्या माणसांना आपल्या संघटनचातूर्याने एकत्र करणारा एकमेवद्वितिय जाणता लोकराजा..!


लोकशाहीची मूल्ये प्रथमत:स्वत:मध्ये अनुकरण करून मग राजपध्दतीत राबविणारे थोर मूल्यपूजक,अखंड सावध असणारे एकमेव अष्टावधानी..!


 देहापेक्षा...आप्तस्वकियांपेक्षा देशहितास प्रथम प्राधान्य देणारे देशाभिमानी सेवक..!


देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो याचे सदैव भान असणारे महान राष्ट्रपूजक..!


लोकांच्याकरिता लोककल्याणकारी योजना लोकांमध्ये जाऊन यशस्वीरित्या राबविणारे लोककल्याणकारी राजे..!


नरवीर तयार करण्याचे सामर्थ्य सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगभूत स्वभाव अन् कौशल्यात होते.एका शब्दाखातर प्राणाची आहुती देणारे अनेक शुर - वीर फक्त आणि फक्त थोरल्या महाराजांवर असणाऱ्या निस्सीम प्रेमाखातर तयार झाले..! असे तयार होणारे नर - वीर स्री अन् पुरुष कोणत्याही श्रीमंतीत वाढलेले नव्हते . अशा अनेक शुरांची श्रीमंती एकच होती अन् ती म्हणजे आपल्याला अगदी प्रेमानं,मायेनं, भेदभाव न करता आपलंस करणारं थोर व्यक्तिमत्व अन् ते म्हणजे शिवराय..!


रयतेचे प्रतिनिधित्व करत असताना अष्टावधानी असणं अजिबात सोपे नाही,पण छ्त्रपती शिवाजी महाराज असे फारच मोजक्या थोरांपैकी एक होते ज्यांनी अष्टावधान प्राप्त केलेलं होतं. 


रयतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींमध्ये, प्रभू श्रीराम, योगेश्वर श्रीकृष्ण यांच्यानंतर अष्टावध्यानत्त्व फक्त आणि सदा सर्वदा वंदनीय छ्त्रपती शिवाजी महाराज अन् महाराणा प्रतापसिंह महाराज यांनाच शक्य झाले होते.


आपण मराठी माणसं ज्यावेळी मराठी मुलुख सोडून ज्यावेळी बाहेर जातो,त्यावेळी आपली ओळख सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या ओळखीनेच होते,हा माझा स्वानुभव आहे..! स्वच्छ चरित्र अन् स्वच्छ चारित्र्य यांचं प्रेरणादायी उदाहरण म्हणजे शिवराय..!


थोरले महाराज होते म्हणून आपला आज ," आज " आहे..!

सामाजिक सौहार्द टिकविण्याचे संस्कार थोरल्या महाराजांनी आपल्याला दिलेत याचा अर्थ त्याची जबाबदारी सर्व भारतीयांची ठरते; फक्त काही विशिष्ट मानवी घटकांचीच नव्हे..!🙏

                                                                                                                                 

समस्त सृष्टीतील मानवी संस्कृतीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या मानवी घटकांना शिवजयंती निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!🌹


सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवरायांना शिव जयंती निमित्त माझ्या कुटुंबाकडून विनम्रपूर्वक श्रद्धेय त्रिवार अभिवादन.! 

🙏🙏🙏


आमचे आमच्या घरातील देवघरातील दररोजचे देवपुजन झाले की, माणसातल्या देव माणसाला म्हणजेच सदा सर्वदा वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी फुल श्रद्धेने अर्पण केल्यावर , आपण अजूनही हिंदवी स्वराज्यात आहोत याची अनुभूती येते..!


ता.क. - होते म्हणून आहोत..!


वंदे मातरम्..! 


शब्दांकन तथा अभिवादक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)


दिनांक -१९/२/२०२२, शनिवार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा