** चिंतन **
" फक्त कल्पना करा ..! "
===============================================================
फक्त कल्पना करा जर सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळी असा धाडसी निर्णय घ्यायला स्वतंत्र नसते अन् ......
त्यावेळी ज्यांच्या हातात निर्णय घ्यायची अधिकृत सत्ताकेंद्रे कुणाच्यातरी हट्टापाई दिल्या गेली होती ते जर त्यावेळी हजर असते...तर...आम्ही संपूर्ण मराठवाडाकर...कदाचित दुसऱ्या पाकिस्तानचे नागरिक राहिलो असतो...!
आपल्या देशाचा स्वातंत्र्य प्राप्ती नंतरचा बराच इतिहास हा हुजरेगिरी ,घराणेशाही,कर्मठ व्यक्तिनिष्ठा अन् जात,धर्म यांच्या अनैतिक दबावापोटी झाकून ठेवल्या गेला..! पण नियती प्रत्येकाला उघडे नागडे करत असते विशिष्ट वेळ आल्यावर..!
" मौका सभी को मिलता हैं..!"☺
ग्रेट होता तुम्ही सरदार वल्लभभाई पटेल..अन् ग्रेट होती तुमची तत्कालीन समयसूचकता..!
उद्या १७ सप्टेंबर ...!
त्या निमित्त तत्कालीन सर्व क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन..!
ता.क.: एखाद्याच्या गैरहजेरीत ,कमी वेळेत उत्तुंग कार्य कसे असावे याचे जगातील एकमेव उदाहरण म्हणजे...हैदराबादच्या निजाम,रझाकार विरूध्द केल्या गेलेली पोलीस अॅक्शन...!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:१६ सप्टेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा