शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

"अंबाबाईचा उदो उदो..! "





चिंतन ©️

" अंबाबाईचा उदो उदो..! "

__________________________________________

गुप्तहेर शिवरायांचे...!
गोंधळी समाज..ज्या समाजाने शिवरायांच्या पायी आपली निष्ठा झोकून दिली..!
गोंधळी समाज..आता पर्यंत यांच्या पाठीवर फक्त त्यांच्या थोरल्या महाराजांची कौतुकाची थाप पडली..!
गोंधळी समाज..ज्यांच्या साठी छत्रपती शिवराय म्हणजे स्वतच्या खऱ्याखुऱ्या धण्यासारखे..!
गोंधळी समाज.. ज्यांच्यातील कित्येकांनी फक्त आपल्या थोरल्या धण्याकरिता स्वतः चे प्राण तळहातावर घेवून हिंदवी स्वराज्याची घडी बसविण्यात आपले प्राण वेचले..! 
गोंधळी समाजाने ,हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना गुप्तहेरांच्या भूमिका वठवून इत्यंभूत माहिती आपल्या धन्याला दिली..!

गोंधळी समाज, ज्याने कित्येक मोहिमा फत्ते केल्या..अन् कित्येक गोंधळी समाजाचे माणसं आपल्या थोरल्या महाराजांसाठी हुतात्मा झाले, पण कुठेही त्यांच्या नावाची नोंद इतिहासात नाही..! कारण पूर्वीही अन् आजही गुप्तहेरांची ओळख ही देशासाठी गुप्तच राहते..!

गोंधळी समाज,ज्यांच्या योगदानाचे भारतीय इतिहासात सर्वोत्तम उदाहरण म्हणजे..फत्ते झालेला किल्ले सिंहगड..!
अभेद्य संरक्षण कवच फोडण्यासाठी तानाजी मालुसरे व गोंधळी समाजाच्या कलाकारांनी, मावळ्यांनी गोंधळी कलेचा योग्य वापर करून उदय भान राठोड सारख्या बलशाली मुघल सरदाराला पाणी पाजले..! ज्या गोंधळी समाजातील कित्येकांनी गुप्तहेर होऊन आपली ओळख न सांगता आपले प्राण दिले पण आपल्या राजाची रणनीती शत्रूला कधीच सांगितली नाही..हा तोच समाज..!

गोंधळी समाजाच्या निष्ठा या पूर्वी..आता अन्..पुढे कित्येक पिढ्यानपिढ्या फक्त आणि आपल्या धन्याच्या,छत्रपती शिवरायांच्या चरणीच राहतील..! गोंधळी समाजाच्या कित्येक गुप्तहेरांनी आपले नाव व ओळख न सांगता आपल्या राजासाठी महान त्यागाचे कार्य केलेले आहे..! मुळात आजही भारतमातेच्या सेवेसाठी कित्येक गुप्तहेर आपल्या प्राणाची आहुती देतात, त्यावेळी गोंधळी समाजातील त्या कित्येक गुप्तहेरांच्या आत्म्याला आनंद होत असेल, ज्यांनी आपले प्राण देशासाठी अर्पण केले आहे..!

फक्त आजही वाईट याचे वाटते..गोंधळी समाज हा भटक्या जमातीतील गरीब समाज..! ज्यांच्या पाठीवर मायेने , बापाच्या प्रेमाने ,विश्वासाने कौतुकाची थाप पाठीवर देणारा युगपुरुष ते म्हणजे छत्रपती शिवराय, बाकीच्या लोकांनी यांची किंमत ओळखली का..?
त्यांच्या कलेचा त्यानंतर योग्य तो राजसन्मान झाला का..?
आजही कित्येकदा, कित्येक संकुचित मानवी मनोवृत्ती या जातीचा शब्दोल्लेख चुकीच्या अर्थाने करतात, तेंव्हा खूप दुःख वाटते..!😔

असो,आजपासून नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे..! त्यानिमित्त जगाची नियंती...आईच्या नवरात्र उत्सव..निमित्त सर्व भारतीयांना नवरंगी मनःपूर्वक शुभेच्छा..!

अंबाबाईचा उदो उदो..!
छत्रपती शिवाजी महाराज की जय...!
वंदे मातरम्..!

लेखक व जगाच्या नियंतीचा ,आईचा उपासक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

व्हिडिओ स्रोत - व्हॉट्स ऍप

दिनांक: १० ऑक्टोबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा