गुरुवार, १० ऑक्टोबर, २०१९

" तरल प्रेम सौंदर्य, अभिनेत्री रेखाजींचे..!"




चिंतन

" तरल प्रेम सौंदर्य, अभिनेत्री रेखाजींचे..!"
=======================================



  

चिंतन ©️

" तरल प्रेम सौंदर्य, अभिनेत्री रेखाजींचे..! "

====================================

 रेखाजींनी सौदर्य व सशक्त अभिनयाने चित्रपट सृष्टीवर सदाबहार जादू केली. प्रेम व त्यातील सर्वोच्च मर्यादा याचा अति सुंदर मिलाप म्हणजे अमिताभजी व रेखाजी यांचे ऐकिवात असलेलं नितांत सुंदर आत्मिक ओढ असलेले प्रेम..! या दोघांच्या निस्सीम प्रेमाच्या कथा प्रत्यक्षात खऱ्या किती अन् खोट्या किती हे त्या दोन जीवांनाच माहीत. मात्र रसिक प्रेक्षकांनी रेखा अन् अमिताभ बच्चन यांच्या या ऐकिवात असलेल्या प्रेमकथेवर भरभरून प्रेम केले हे मात्र प्रेमळ सत्य..! या दोघांना व जया भादुरी यांना एकत्रित तेही तत्कालीन वास्तवात असलेल्या सत्य कथेत जिवंत अभिनय करून घेण्याचे धाडस सिलसिला या चित्रपटाद्वारे  दिग्दर्शक यश चोप्रा यांनी केले. हा चित्रपट आजही खूप सुंदर व तरल प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.हे धाडस वास्तवात उतरविण्याचे कसब फक्त यश चोप्रा यांच्यातच होते हे मात्र त्रिकालाबाधित सत्य..!

आज कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकात अशी ऐकण्यात आलेली वास्तविक सत्य कथा,सत्य असणाऱ्या जिवंत पात्रांना घेऊन सुंदर कलाकृती निर्माण करण्याचे धाडस नाही..! बहुदा अशी स्वच्छ मनांची व वास्तविकता असलेली सुंदर तरल कथाच अस्तित्वात नसावी. किंवा जरी यदा कदाचित अशी जिवंत सुंदर कथा वास्तवात असेल तर त्यातील पात्रात ती निस्सीम प्रेम भक्ती नसावी.. जी ...की रेखाजी व अमिताभ बच्चन यांच्या मध्ये होती अन् आहे..!

 सिलसिला चित्रपटानंतर रेखा व अमिताभजी यांचे ऐकिवात असलेलं प्रेम व भावना अव्यक्तच राहिल्या..त्या आजतागायत..!अशी अव्यक्त सत्य प्रेमकथा व अभिनेत्री पुन्हा होणे नाही. माझ्या मते अव्यक्त प्रेमाची ही अजरामर कथा ती ही वास्तविक पात्रांभोवती गुंभली. हे दोघेही जो पर्यंत जिवंत आहेत तो पर्यंत या दोघांच्या कलेवर निस्सीम प्रेम करणारे चाहते  या दोघांवर भरभरून प्रेम नक्कीच करत राहतील यात तिळमात्र शंका येते.

एकमेकांच्या सन्मानासाठी दूर झालेल्या प्रेमकथा खूपच दुर्मिळ..! त्यात रेखाजी व अमिताभ बच्चन यांचा आवर्जून उल्लेख करावाच लागेल. प्रेम ही गोष्ट कधीही बाजारात विकाऊ नव्हती अन् नसणार..! ज्यांनी ज्यांनी ईश्वरीय देणगी प्रेमाचा पवित्र भाव बाजारात आणला त्यांच्या आयुष्याचे धिंडवडे झालेले आहेत अन् होतील सुध्दा हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

 प्रेम ही त्या जगाच्या नियंत्याने मानवाला दिलेली सर्वात सुंदर भक्तिपूर्ण भेट आहे. त्या भक्तिपूर्ण भेटीचे ज्याला पावित्र्य  समजले त्यालाच समजले. बाकीचे त्यात अश्लीलता , वासना शोधत राहिले अन् ज्यांना त्यात भक्तिपूर्ण भाव समजले ते त्यात ईश्वराला शोधत राहिले, पावित्र्य शोधत राहिले. रेखाजी अन् अमिताभ बच्चनजी यांनी त्यात पावित्र्य शोधले अन् अजरामर झाले त्याच जगाच्या नियंत्याच्या या भावविश्वात एक अजरामर प्रेमयुगल म्हणून..!

आज आपण पाहतोय, हल्लीच्या काही तद्दन फालतू नट,नट्या, आपल्या चारित्र्याचे स्वतः हून धिंडवडे उडवताना पाहतोय. पण ही जुनी कलेवर ,कलाकारांवर निस्सीम प्रेम करणारी माणसं अव्यक्त प्रेमात तहहयात राहणे यांनी पसंद केले पण एकमेकांची खाजगी प्रकरणे वेशीवर टांगून स्वतः च्या प्रेमाचे बाजारीकरण यांनी कदापि केले नाही. नव्हे..नव्हे..अशी पिढी संपल्यातच  जमा आहे.

असो, आज अभिनेत्री रेखाजींचा जन्मदिन आहे, त्यानिमित्त त्यांना मनःपुर्वक शुभेच्छा..! 🌹

वंदे मातरम्

ता.क.: कृपया या माझ्या लेखाकडे कडे निव्वळ  कला, रसिकता,भावुकता, नितळ मनाच्या नात्याने पहावे..ही नम्र अपेक्षा..! 🙏🏻
वाकड्यात घुसू नये..!
                                                                           
 एक तरल भावनिक रसिक  : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

(© सदरील  लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)

दिनांक:१०/१०/२०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा