चिंतन
" भारताचे पहिले पंतप्रधान, नेताजी सुभाषचंद्र बोस..!"
===================================
३० डिसेंबर १९४३ ला भारतातील अंदमान व निकोबार ही बेटे इंग्रजांच्या जूलमी राजवटीच्या जोखडातून स्वातंत्र्य झाली होती..! व या रोजी येथे आझाद हिंद सरकार स्थापन होऊन तिरंगी राष्ट्रध्वजाचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते जाहीररित्या ध्वजारोहण झाले होते..!(ते स्मृतिस्थळ आजही तेथे आहे..!)
त्या बद्दल प्रथमतः आझाद हिंद सेना व तत्कालीन भारताचा काही भूभाग स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानचे पाहिले पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विनम्र अभिवादन..!
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, मात्र त्याही वेळी भारतातील संपूर्ण भूप्रदेश इंग्रजांच्या,पोर्तुगीजांच्या ,व काही संस्थानिकांच्या जूलमी राजवटीच्या जोखडातून स्वातंत्र्य झालेला नव्हता,तरी देखील चाचा नेहरू यांचा नामोल्लेख
" स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान " असाच होतो..!
मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देखील सशस्त्र क्रांती करून भारतातील काही भूभाग अंदमान आणि निकोबार बेटे १५ऑगस्ट १९४७ पूर्वी स्वतंत्र केली होती.. म्हणून नेताजींचा ही
" स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान" असा नामोल्लेख करणे संयुक्तिक ठरेल..!
आज स्मृतिदिन आहे...अंदमान व निकोबार बेटे स्वातंत्र्य झाल्याचा..! त्यानिमित्त आझाद हिंद सेना मधील सर्व भारतीय सैनिकांना व " भारताचे पहिले पंतप्रधान, नेताजी सुभाषचंद्र बोस " यांना विनम्र अभिवादन..!
जय हिंद..!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: ३०/१२/२०१८



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा