शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र. २४ 🧿 तंजावरचे चोल घराणे 🧿



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २४ 🛑

       🧿 तंजावरचे चोल घराणे 🧿

===================================

१) ♦️ विजयालय♦️ ( इ.स.८५० ते ८७१)

🔘 विजयालय याने तंजावर या ठिकाणी नवी राजधानी स्थापन करू चोल सत्तेचा पाया रचला.
🔘 अत्यंत वैभवशाली चोल घराण्याला वैभव प्राप्त करून दिले.

२) ♦️ आदित्य पहिला♦️ ( इ. स.८७१ ते ९०७)

🔘 विजयालय यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा आदित्य पहिला हा चोल गादीवर आला.
🔘 आदित्य पहिला याने, पल्लव राजा अपराजितवर्मन याला इ. स.८९८ मध्ये ठार करून पल्लव सत्ता संपुष्टात आणली.
🔘 आदित्य पहिला हा शिवभक्त होता,त्याने  अनेक शिवमंदिरे बांधली.

३) ♦️ परांतक पहिला ♦️ ( इ.स.९०७ ते ९५३)

🔘 आदित्य पहिला यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा परांतक पहिला हा गादीवर आला.
🔘 परांतक पहिला यांच्या कारकिर्दीच्या अखेरीस राष्ट्रकूट राजा कृष्ण तिसरा संघर्षात कृष्णाने इ. स.९४९ मध्ये तक्कोलमच्या लढाईत परांतक पहिला यांचा निर्णायक पराभव केला. यानंतर जवळपास तीस वर्षे चोल सत्ता निर्जीव झाली.

४)  ♦️ राजराज चोल♦️ ( इ. स.९८५ ते १०१४)

🔘 इ. स.९८५ मध्ये सुंदर चोलाचा मुलगा राजराज हा गादीवर आला.
🔘  राजराज चोल याने त्रिवेंद्रम येथे चेरांच्या आरमाराचा  पराभव केला.
🔘  राजराज चोल याने आपल्या बलिष्ठ नाविक सत्तेच्या जोरावर लखदीव ( लक्षद्वीप ) व मालदीव बेटे काबीज केले.
🔘  राजराज चोल याने सिलोन ( श्रीलंका ) वर अधिकार प्राप्त केला.सिलोन येथे एक शिवमंदिर बांधले.
🔘  राजराज चोल याने सुरू केलेली जमीन मोजणीची पद्धत आणि स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या कार्यक्षम प्रशासन व्यवस्थेची साक्ष देतात.
🔘  राजराज चोल यांच्या कारकिर्दीत तंजावर येथील
' राजराजेश्वर मंदिर ' चोलांच्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.
🔘  राजराज चोल हा स्वतः शैव असूनही विष्णुची मंदिरे बांधली.

५) ♦️ राजेंद्र चोल पहिला♦️ ( इ. स.१०१४ ते १०४४)

🔘  राजराज चोल यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा  राजेंद्र चोल पहिला हा इ. स.१०१४ मध्ये गादीवर आला.
🔘 राजेंद्र चोल पहिला याने संपूर्ण सिलोन ( श्रीलंका ) जिंकले.
🔘 राजेंद्र चोल पहिला याने ' गंगाइकोंडचोलपुरम ' या नवीन राजधानीची स्थापना केली.
🔘 राजधानी जवळ सोळा मैल लांबीचा एक विस्तीर्ण तलाव ' चोलगंगम '  बांधला.
🔘 इ. स.१०२५ मध्ये राजेंद्र चोल पहिला याने आग्नेय आशियातील मलाया ( मलेशिया ) ,जावा,सुमात्रा असे एकूण शैलेंद्र साम्राज्य जिंकले. राजेंद्र चोल पहिला याचा सागरी दिग्विजय पूर्ण यशस्वी झाला.
🔘 चोल सत्ता मान्य करून शैलेंद्र राजाची सुटका करण्यात येऊन त्याचे राज्य त्याला वापस देण्यात आले.
🔘 राजेंद्र चोल पहिला याने अंदमान निकोबार बेटे आणि पेगु प्रांत जिंकला.
🔘 तीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर इ.स.१०४४ मध्ये राजेंद्र चोल पहिला मृत्यू पावला.

६) ♦️ राजाधिराज पहिला♦️  ( इ. स.१०४४ ते १०५४)

🔘 राजेंद्र चोल पहिला यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा राजाधिराज पहिला याने पांड्य, सिंहल,केरळ येथील राजांची बंड, मोडून काढली.
🔘 चालुक्य राजा सोमेश्वर पहिला याच्याशी लढतांना कोप्पम युध्दात राजाधिराज पहिला इ. स.१०५४ मध्ये ठार झाला.

७) ♦️ दुसरा राजेंद्र♦️

८) ♦️ वीर राजेंद्र ♦️

🔘 दुसरा राजेंद्र आणि वीर राजेंद्र  यांनी चोल साम्राज्य अभंग राखले.

९) ♦️कुलोत्तुंग पहिला♦️ ( इ.स.१०७० ते ११२२)

🔘 पहिल्या राजेंद्रच्या मुलीचा अम्मंगयाम्बाचा आणि पूर्वेकडील वेंगीचा चालुक्य राजराज दुसरा यांचा पुत्र राजेंद्र चोल उर्फ कुलोत्तुंग पहिला याने इ. स.१०७० मध्ये चोल सत्ता बळकावली.
🔘 कुलोत्तुंग पहिला  हा उदारमतवादी ,प्रजाहितदक्ष राजा होता.
🔘 कुलोत्तुंग पहिला यांच्या काळात कांचीचे महत्त्व अतिशय वाढले.
🔘 कुलोत्तुंग पहिला यांच्या नंतरचे चोल राजे दुर्बल निघाले. इ. स.१२५० मध्ये चोल साम्राज्याचा  -हास  होऊन त्यातून पांड्य, होयसळ व काकतीय या सत्तांचा उदय झाला.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  ५ मे २०२०, मंगळवार

🔴 प्राचीन भारत-
    क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा