मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" सर,चहा घ्या ना..!"
======================================
आज दिनांक २० जुलै २०१९ रोजी सकाळी एक शिक्षक,काही महत्त्वाच्या कामासाठी गावात गेले होते.त्यांचे काम करण्यासाठी ते शिक्षक,खूप माणसांची वर्दळ असलेल्या एका चहाच्या दुकानात जाऊन बसले..! सदरील शिक्षक चहा पीत नाही पण, कामानिमित्त तिथं जावं लागलं होतं..!
तिथं, त्याच शिक्षकाच्या माध्यमिक शाळेतील, प्राथमिक वर्गातील एक विद्यार्थी चहा पीत होता.सदरील शिक्षकाचे त्या मुलाकडे लक्ष गेले.तो मस्तपैकी एकटाच चहा पीत होता.इतक्यात त्या प्राथमिक वर्गातील मुलाचे लक्ष सदरील शिक्षकाकडे गेले.तो मुलगा लगेच म्हणाला...
" सर,चहा घ्या ना..!"
शिक्षक: " का..रे..शाळा सोडून,तू इकडे चहा पीत बसला आहेस..! शाळेत जा..!"
तो मुलगा सहजपणे म्हणाला : " हा...सर...लगीच जातो..! तुम्ही नाही घेत मग चहा..?"
ते शिक्षक ," शिक्षणाचा मूलभूत हक्क कायदा अंतर्गत मुलांना अजिबात शिक्षा करू नये या कलमामूळे " , त्या मुलाकडे फक्त शून्य नजरेनं पाहू लागले.त्या मुलाला सदरील शिक्षकाच्या शून्य नजरेचा अंदाज आला.तो लगेच पटपट चहा पिऊन निघून गेला.
सदरील शिक्षक तेंव्हापासून ते.... त्या मुलाच्या पालकाची भेट होई पर्यंत याच विचारात पडले आहे की,
" एवढ्या लहान वयात मुलांनी ,हॉटेल मध्ये जाऊन चहा पिणे योग्य आहे का..?
अशा मुलांना पैसे कोण देतं..? किंवा अशा मुलांजवळ पैसे कसे काय येतात..?अशाने मौजमजा करण्याच्या सवयी लवकर लागत तर नाही ना..? इ. अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत..!
ता.क.; येत्या सोमवारी सदरील शिक्षक, त्या मुलाच्या पालकाची प्रत्यक्ष भेट घेऊन यावर प्रेमळ वातावरणात अनौपचारिक चर्चा करून उद्बोधन करणार आहे..! तसेच शाळेत देखील काही वर्गात यावर प्रेमळ वातावरणात अनौपचारिक वातावरणात त्या मुलाचा अजिबात उल्लेख न करता उद्बोधन करणार आहेत..!
वंदे मातरम्..!
लेखक: सदरील शिक्षक..!
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक: २० जुलै २०१९, शनिवार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा