आमचे गाव, आमची माणसं..!
" खूप खूप धन्यवाद मित्रा आजू..! "
___________________________________________
तू आज दिनांक १५ जुलै २०१८ रोजी भर पावसात..फक्त आणि फक्त भेटण्यासाठी आलास..! अर्थात पाऊस नेहमीप्रमाणेच बुरुबुरू सुरू होता..!
पण तुझ्या आत्मीय सहपरिवार भेटीने निदान आमचे संपूर्ण कुटुंब तरी प्रेमाने न्हावून निघाले..! मित्रा आजू,तुला नेहमी भेटलो की,मला माझ्या गत आयुष्यातील एका खूप भावूक प्रसंग आठवतो मित्रा..!
ज्यावेळी माझी डी.एड.करिता निवड झाली होती.माझा नंबर महाराष्ट्रातील तत्कालीन अती शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे आदरणीय शिक्षण महर्षी व्यंकट आण्णा रणधीर यांचे
" डॉ.बाबासाहेब आंबेडकर डी.एड.कॉलेज, बोराडी, ता.शिरपूर,जिल्हा धुळे येथे निवड झाली होती. पालखेड येथून मी माझ्या वडिलांसोबत एक लोखंडी पेटी व त्यात दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन निघालो होतो.त्या रोजी पोळ्याचा सण होता..!तुझ्या किराणा दुकानासमोर आम्ही चाललो होतो..तेवढ्यात तू मला आवाज दिला..
" अरे,नंदन..इकडे ये..!"
मी कुतूहलापोटी गेलो.तर तू मोठ्या श्रद्धेने माझ्या हातावर साखर ठेवलीस अन् म्हणाला होतास...
" नंदन,काही काळजी करू नको,तू आपल्या गावापासून खूप दूर चालला आहेस,पण..मी दिलेल्या या साखरेचा गोडवा तुला सदैव गोड व सुरक्षित ठेवील..!"
माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझी स्व.आई व वडील सोडून कुणीतरी माझी , इतकी भावनिक आधाराची पाठराखण केली होती अन् तो तूच होतास मित्रा आजू..!
आज तू ,सपत्नीक माझ्या या घरी आलास,याच घराची पूजा करायला तू फक्त माझ्या निख्खळ मैत्रीखातर पालखेड येथून आला होतास..!मला आज हे सांगायला अभिमान वाटतो की,मी ज्यारोजी जी माझ्या घराची पूजा फक्त माझ्या कुटुंबीयांसोबत केली होती..त्यावेळी अनावश्यक खर्चाला कात्री लावून मी तोच माझ्या ऐपती एवढा खर्च एका अनाथाश्रम ला देणगी दिला होता..! कारण ज्यांना भोजनाची खरी गरज आहे त्यांच्या मुखी ते गेल्याचे कृतार्थ भाव माझ्या अंतर्मनात मरे पर्यंत राहील..! त्या भावूक घटनेला म्हणजेच माझ्या घराच्या पूजेला तुझा स्पर्श झाला होता याचा मला नेहमी आनंदच होतो. हे मी आज पर्यंत जाहीर केले नव्हते पण..तुझ्या हस्ते केलेल्या त्याच पूजेचा ,तू आज याच घरी भेट दिल्याने आज सांगावसं वाटला..म्हणून व्यक्त झालो मित्रा..!
शाब्दिक कोट्या करायला मला हवेहवेसे ठिकाण म्हणजे तूच आहेस मित्रा..!अर्थात तूही करतोस म्हणा..!😂
तू आज आपल्या पालखेड पंचक्रोशीत हिंदू धर्मातील विविध धार्मिक विधी कार्यक्रमात नाव लौकीक मिळवला आहे याचा खूप आनंद वाटतो मित्रा..!
आशा करतो,जर माझ्या दोन्ही मुलांनी मला विचारून लग्न केलेच तर त्यांचे लग्नही तुझ्याच हस्ते लावून,त्यात एक सुमधुर मंगलाष्टक म्हणायला लावून एक सुंदर प्रेमाचं, भावनिक नात्याचं वर्तुळ पूर्ण करील..!
काळजी घे मित्रा..!
वंदे मातरम्..!
लेखक व अजय काळे उपाख्य आजू उपाख्य गुरु चा बालमित्र: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले
स्थळ: औरंगाबाद.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:१५ जूलै २०१८




























