गुरुवार, ३० जुलै, २०२०

" मनमोकळा प्रिय मित्र आमचा विजू...! "☺





" मला प्रवासात भेटलेली माणसं..!"

" मनमोकळा प्रिय मित्र आमचा विजू...! "☺

==================================

माझा अतिशय मनमोकळ्या स्वभावाचा डी.एड. चा जिवलग मित्र विजय कालभिले पाटील. मूळ राहणार,नाटवी,ता.सिल्लोड, ह.मू.औरंगाबाद

विजू ने व मी आमच्यातील पौगंडावस्थेतील मित्राला व मैत्रीला अजिबात मरू दिलेले नाही..! आमच्या प्रत्यक्ष भेटीतील किंवा वैयक्तिक ऑनलाईन संपर्कात आमची तीच पौगंडावस्थेतील मैत्री नेहमी जिवंत होत असते..!आमच्यातील भेटीने आमचे काही मित्रही आनंदीत होत असतात..आमच्या आनंदात तेही हिस्सेदारी मिळवत असतात..!पण तेही मोजकेच आहेत बरं का..!😂
कारण बऱ्याच जणांना बहुदा असे वाटते की, आम्ही आता प्रौढ झालो आहोत,आपण शिक्षक आहोत वगैरे..इत्यादी मानसिकतेतून अजूनही बाहेर पडलेले नाही..!

माझे तर प्रांजळ मत आहे की,प्रत्येक माणसाने  त्याच्या विशिष्ट चाकोरीबद्ध आयुष्यात असे काही जिवलग मित्र नक्कीच मिळवायला हवेत...जिथे आपण अंतर्मनातील भाव व्यक्त करू शकतो..! अनौपचारिकपणे वर्तन करू शकतो..! मात्र असे वर्तन समाजाला अहित पोहोचविणारे कदापि नसावे..!त्यावेळी तिथे फक्त आणि फक्त ती निरागस मैत्री व त्यात सहभागी ते मनमोकळे मित्रच असतील..!

उठसुठ नेहमी..नेहमी..तेच..ते..चाकोरीबद्ध जीवन..त्यातील भेटलेले "औपचारिक वर्तन करणारे " मित्र व त्यांची मैत्री..यामुळे माणूस मनोरुग्ण होऊ शकतो..व त्याचे अख्खे आयुष्य औपचारिक बनून जाते..!

अर्थात आमच्या सारखी अशी मैत्री मिळवायला ती खूप जुनी व एकमेकांचा इतिहास ,भूगोल माहीत असेल तरच अशा मैत्रीला बहर येतो..! उगीचच अचानक भेटलेल्या मित्रात अशी मैत्री बहरू शकत नाही..!यदा कदाचित जरी बहरली तरी..त्यात गैरसमज देखील होऊ शकतात..! अशा अचानक भेटलेल्या मित्रात अशीच आघळ.. पघळ, अनौपचारिक मैत्री निर्माण व्हायला काही कालावधी जाऊ द्यावा लागतो तेंव्हाच त्या नात्यात समज निर्माण होतो..!

म्हणून आमच्या सारखी अशी मैत्री करताना जरा जपून..!

वंदे मातरम्..!

मनमोकळ्या विजुचा मित्र : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

छायाचित्र दिनांक: ११ जून २०१८
आणि माझ्या फेसबुक भिंतीवर लेखन दिनांक : २/७/२०१८
स्थळ :औरंगाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा