सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

" तू समजुन घेणारा जिवलग मित्र माझा नितीन...! "




" मला प्रवासात भेटलेली माणसं..! "

 " तू समजुन घेणारा जिवलग मित्र माझा नितीन...! "







_____________________________________________

तू समजुन घेणारा..!
तू स्वच्छ मनाचा..!
तू आमच्या काळी होतास राजबिंडा..अर्थात आजही आहेस..!
तू मित्रावर व मैत्रीवर भरभरून प्रेम करणारा..!
तू माझ्या शिक्षकी आयुष्याच्या प्रारंभाचा गोड साक्षीदार..!
तू अन् मी बऱ्याच बाबतीत साम्य...अल्पसे अपवाद..!
तू माझ्या शिक्षकी आयुष्याच्या वाटेवर भेटलेला खूप गोड मित्र..!
तू केले कलेवर व रसिकतेवर भरभरून प्रेम..!
तू अन् आम्ही नाही विसरणार तो रम्य काळ..!
तू त्यात होतास शीर्ष स्थानी..!
तू तोच होतास..ज्याला बघून मला आजही कुणा एखाद्या बापाने आपल्या गोंडस मुलीला मांडीवर घेतलं की तूच नजरेसमोर येतो अन् नजरेसमोर येते तुझी गोड परी..!
तू तोच बाप आहेस..ज्याचा आदर्श घ्यावा त्या सर्व बापांनी,ज्यांना सुंदर परी सारख्या कन्या असतात ..!
तू तोच आहेस मित्रा, एका बापानं आपल्या मुलीवर कसं अन् किती प्रेम करावं याचं मूर्तीमंत प्रतीक..!
तू तोच आहेस..ज्यानं आपल्या लेकीसाठी आपल्या संपूर्ण आयुष्याचं ऐश्वर्य वाहिलं..!

का..कुणास ठावूक ... मला प्रत्येक मुलीच्या बापात तूच दिसतो..!
बहुदा मी एका मुलीच्या आयुष्यातील बाप रुपी असणाऱ्या देवाला प्रत्यक्ष पाहिल्याचा तो भक्तीचा परिणाम असावा..!
असा बाप अन् त्या बापावर निस्सीम प्रेम करणारी कन्या होणे नाही..!

दीदी आम्हाला तुझी आजही खूप खूप आठवण येते गं..!
तू माझा कधीकाळी सख्खा शेजारी होतास..!
तू कधीकाळी माझ्या नोकरीचा अतूट हिस्सा होतास..!
तू कधी माझ्या सर्व...सर्व भावना ओळखून घेणारा होतास..!
मला जळगावच्या शाळेत नाही करमले तर मधल्या सुट्टीत भिसेवाडीला तुझ्याकडे येणारा मीच होतो..!
तू आजही बऱ्याच बाबतीत लाजाळू आहेस पण...मलाच माहीत आहे की तू खरचं किती लाजाळू आहेस..!
तू खूप खूप नशीबवान आहेस मित्रा..तुला माझ्या ताईंसारखी अर्धांगिनी मिळाली..!
माझी ताई तुझ्या आयुष्यात नसती आली तर...तुझ्या सारख्या निव्वळ भावनेवर प्रेम करणाऱ्या माणसाला हे आयुष्य एखाद्या मरुभूमी सारखे भासले असते..हे मात्र नक्की..!
खर की नाही..?

मित्रा नितीन,
पुन्हा एकदा तेच गतकाळातील लासुरगाव केंद्रांतर्गत आपण व्यतीत केलेले दिवस यावेत,
पुन्हा त्याच अनेकानेक आठवणींचे क्षण ओथंबून यावेत,
पुन्हा तोच चिखलाचा रस्ता, त्यावरून येणे जाणे व्हावेत अन पुन्हा त्याच भिसेवाडीच्या शाळेत निवांत भेटावे,
पुन्हा त्याच लासुरगावातील मुक्कामाचे रम्य क्षण यावेत,
पुन्हा तोच तिरुपती बालाजी प्रवास यावा,
पुन्हा तेच जळगाव, नागपूर येथील शिक्षक संघाचे अधिवेशन अन् त्यायोगे झालेला सुखद प्रवास व्हावा,
पण....

नियती, आयुष्यातील गतकाळातील आठवणीत फक्त रमवणे शिकवते, तेच जसेच्या तसेच क्षण पुन्हा येत नाही..! आयुष्यात असतात फक्त आणि फक्त गतकाळातील रम्य, सुखद आणि दुःखद  आठवणींचा महापूर..!
त्यात आपल्या सारख्यांनी यथेच्छ डुबकी मारायची असते, फक्त भावनेवर निस्सीम प्रेम करण्यासाठी..!

आपल्या त्याच गतकाळातील आयुष्यात आपल्याला पुत्रवत जपणारे स्व. सावळे सर, स्व.टोणपे ( जहागीरदार ) सर , स्व. रगडे सर, स्व. बनकर सर, स्व.एस.एम.जाधव सर, स्व.ठोंबरे सर यांचा सहवास पुन्हा आपल्या शिक्षकी आयुष्यात लाभला नाही..! कारण ही सर्व महान माणसं देवाघरी गेल्यावर पुन्हा यांच्या सारखी अस्सल प्रेमळ माणसं भेटलीच नाही..!😔🙏🏻

असो, खूप काही व्यक्त व्हावे वाटते, पण यथावकाश नंतर नक्कीच लिहिल यावर..! 🌹🙏🏻


असाच गोड राहा मित्रा..सदा सर्वदा..!
राहणारच...कारण तू ..नितीन बाजीराव पगार आहेस..!

ता. क. - दिनविशेष...! असाच गोड राहा..!

वंदे मातरम् 

नितीनचा मित्र व लेखक : नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव©️ 

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1



दिनांक:८ ऑक्टोबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा