#चिंतन
वंदे मातरम्..!🙏
====================
मातृभूमी ही माणसाच्या आयुष्यात सदैव सोबत असते.
मातृभूमी चिरंजीव असते.
मातृभूमी फक्त गाव , तालुका , जिल्हा राज्य एवढ्या पुरती मर्यादित अन् संकुचितही नसते.
तर मातृभूमी व्यापक अर्थाने एक राष्ट्र, देश म्हणून असते.
आणि देश सर्वतोपरी सदा सर्वदा श्रेष्ठ असतो.
वंदे मातरम् हा फक्त एका राष्ट्रीय गीताचा भाग नाही तर तो आपल्या समस्त भारतीयांचा प्राण आहे..!
वंदे मातरम् आपल्या समस्त भारतीयांच्या मूळ अस्तित्वाचा प्राण आहे..!
वंदे मातरम् आपल्या मूळ सांस्कृतिक ओळखीची निशाणी आहे..!
वंदे मातरम् आपल्या जाणिवांची ओळख आहे..!
या संपूर्ण पृथ्वीवर फक्त आपणच भारतीय आपल्या देशाला श्रध्देने आई समजतो. त्या अत्यंत उच्च कोटीच्या प्रेमळ अन् मायाळू मूल्याचा वंदे मातरम् हा व्यक्त होणारा हुंकार आहे..!
इ.स. १९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली होती, ती रद्द करून पुन्हा फाळणी केलेला भारतमातेचा भूभाग भारतमातेत विलीन करण्यात आला होता. त्यावेळी वंदे मातरम् हा जय घोष मूलमंत्र झाला होता. एवढी सामाजिक एकजुटीची शक्ती आजतागायत एकमेव वंदे मातरम् या जय घोषात आढळून आलेली आहे.
अर्वाचीन भारताच्या इतिहासात जहाल अन् मवाळ या दोन्ही विचारधारांनी, अधिकृत संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी संमत केलेला जयघोष म्हणजे वंदे मातरम् आहे..!
आपल्या पूर्वजांनी आपल्या या भारत भूमीला जपून अन् सुरक्षित ठेवण्यासाठी कधी शस्त्र हाती घेतले, कधी शास्त्र हाती घेतले तर कधी नम्रतेचे मूल्य अंगिकारले. त्या समस्त भारतीयांच्या अंतर्मनातील स्फुल्लिंग जागृत केले ते वंदे मातरम् याच जय घोषाने..!
आपल्या पूर्वजांनी पेटविलेले ते वंदे मातरम् चे स्फुल्लिंग आजही अन् भविष्यातही सदैव निनादत राहील..!
आणि माझ्या मते सर्वात महत्त्वाचे म्हणजे वंदे मातरम् हा जय घोष आपल्या आईला, यथा योग्य स्री शक्तीला हृदयातून केलेलं विनम्र वंदन असते. आईचे अन् यथा योग्य स्री शक्तीचे महत्त्व अन् ममत्व या भूतलावर सर्वात श्रेष्ठ असते.त्या श्रेष्ठत्वाला केलेलं वंदन म्हणजेच वंदे मातरम् आहे असे माझे ठाम मत आहे.
जेव्हा पासून माझं लग्न झालं आहे तेंव्हा पासून ते आजतागायत माझ्या बहुतांश शर्टच्या खिशाच्या बाहेरील बाजूवर माझ्या धर्मपत्नीने साध्या सुई दोऱ्याने' वंदे मातरम् ' आहे.
माझ्या शर्टच्या खिशावर माझ्या पत्नीने अगदी समरसून सुई दोऱ्याने वंदे मातरम् लिहिलेले असते, त्यामुळं एका अर्थाने माझ्या पत्नीचा आत्मिक सहवास सदैव सोबत असतो ही प्रेमळ भावना सदैव सोबत असते.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या भारतमातेला वंदन केल्याची श्रद्धेय भावना सदैव हृदयात असते.
असो, आज वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे झाली आहेत. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताचे रचेयता बंकिमचंद्र चतर्जी यांना विनम्र अभिवादन..!🙏
ता. क. : वेद मंत्राहुनी वंद्य आम्हा वंद्य वंदे मातरम्..!
वंदे मातरम्
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ७/११/२०२५, शुक्रवार

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा