मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

थोर लेखक वि.स.खांडेकरांच्या दोन मानसकन्या..!



थोर लेखक वि.स.खांडेकरांच्या दोन मानसकन्या..! 
=======================================
एक देवयानी अन् दुसरी शर्मिष्ठा..!

वि.स.खांडेकर यांच्या ययाती या महाभारतकालीन ग्रंथातील या दोन्ही मानसकन्या आपापल्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतात..! त्यापैकी...देवयानी ही काही काळानंतर भावनाशून्य होत गेली अन् शर्मिष्ठा आहे त्याच साध्या स्वच्छ मानसिकतेत आपलं आयुष्य जगत राहिली..आपल्या स्वच्छ आणि नितळ प्रेमात..!

वि.स.खांडेकर हे माणसांच्या नात्यांचा गुंता सोडविणारे थोर विचारवंत अन् लेखक..!

वि.स.खांडेकर यांनी दोघींना आपापल्या आयुष्यात रेखाटलं..! मात्र त्यात शेवटी रुपगर्विता अन् कृतघ्नपणा दाखवून परखड असणारी देवयानी ही दुर्दैवीच राहिली..!ययाती अखेर पर्यंत द्विधा मनःस्थितीत राहिला..!


अद्यापही पृथ्वीवर  नात्यांवर स्वच्छ प्रेम करणारी माणसं आहेत म्हणून तर कुणात तरी शर्मिष्ठा जिवंत आहे..!नसता अनेक देवयानी सारख्या मानसिकतेच्या माणसांनी माणसांचे आयुष्य पार स्मशान केलेले होते..अन् आहे.यातून तेच सहिसलामत सुटले जे कचा सारखे प्रगल्भ होते अन् आहेत..! नसता देवयानी कायमची वरचढ ठरली असती..!

वि.स.खांडेकर म्हणजे मराठी साहित्याला पडलेलं गोड स्वप्नं...! असं स्वप्न ,ज्याने अनेकाच्या भावविश्वाचा कोपरा आपल्या सुगंधी,रसिक भावनांनी दरवळत राहिला...सदा सर्वदा..!

वंदे मातरम्..!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
दिनांक:१७ सप्टेंबर २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा