शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

" शूरा मी वंदिले..! "




                                  आमचे गाव आमची माणसं..!

                                                                 " शूरा मी वंदिले..! "

___________________________________________

आत्ताच  माझ्या पालखेड  गावातील गणेश नरूटे(भारतीय सैनिक)यास मेसेंजरने जन्मदिनाच्या  शूभेच्छा दिल्या.त्यांची पोस्टींग  जम्मू ला आहे.त्यांच्या व माझ्यातील मेसेंजर वर झालेला संवाद जसाच्या तसा पूढीलप्रमाणे-
                             
"गणू बेटा,जन्मदिन निमित्त  शूभेच्छा...!उशीर झाला.कारण तांत्रिक ...!"        

" Thank u sir. ..kahi harkat nahi let jhalat ..!"
                 
" सध्या पोस्टींग कूठे?  "
 
"Jammu..!"
                                                       
" सध्या  तेथील वातावरण गरम असेल ..!"
                                     
 " High alert aahe ..!"
                                                           
" काळजी घे...!"
                                                      " Ho..swatahachi kalji ghetli tarach dusryachi madad karu shakto. ....and thanks ..!"                                          

" तूम्ही आहात तर आम्ही आहोत.माझ्या परिवाराकडून तूम्हा जवानांना विनम्र  वंदन...वंदे  मातरम्....!"
                               
" Dhanyavad..!"
असे म्हणून गणू व माझ्यातील संवाद संपला..!
                                                                     
वरील संवाद प्रसंगातून गणूचा एक संवाद माझ्या मनाला खूप हेलाऊन गेला...   तो असा-

"    Ho..swatachi kalji ghetli tarach dusryachi madat karu shakto..!"  

गणू आणि माझ्यातील संवाद संपला अन्  गणू रात्रपाळीसाठी, गर्द झाडीत, अंधारात हातात शस्त्र घेऊन आपल्या मोहिमेवर निघून गेला..!
अन् त्याच वेळी मी किंवा अनेक घरात झोपणारी माणसं पहुडली होती आपापल्या बिछान्यावर..! गणूचे अन् माझ्या संवादातील एक वाक्य सतत माझ्या मनात काहूर घालत होते अन् त्याचे ते वाक्य होते.....
"Hi..swatachi kalji ghetali tarach dusaryachi madar Karu shakato..!"                            

किती मोठा व देशातील नागरिकांप्रती भारतीय सैनिकांमध्ये असलेल्या  जबाबदारीचा अर्थ होता या वाक्यात....!

आपले जवान आपल्या कूटूंबापासून दूर देशाचे रक्षण करत असतांना आपण अनेकवेळी जात,पात इ.अनेक राष्ट्रीय  एकतेला घातक बाबींवर पोकळ बातांवर वेळ वाया घालवतो.त्यावेळी जवानांचा एकच धर्म असतो आणि तो म्हणजे भारतीय...!

 देहाकडून देवाकडे जातांना मध्ये देश लागतो..ही जाणीव भारतीय नागरिकांत असावी..असे स्वातंत्रवीर सावरकर यांना अपेक्षित होते..! आज स्वातंत्रवीर सावरकर यांचे जरी नाव घेतले तरी आपल्या समाजातील काही घाणेरड्या प्रवूत्तीच्या लोकांना त्यांची जात दिसते...! खूप वाईट वाटते अशावेळी..! आज आपल्या गावात,देशात आपण जेंव्हा रात्रीची शांत झोप घेत असतो,त्यावेळी हेच आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून आपल्या मातृभूमीचे रक्षण करत असतात..! त्यांना ना तमा असते आप्त स्वकियांची ना मित्र परिवाराची..! त्यांच्या समोर त्यावेळी फक्त आणि फक्त माझा देश आणि त्याचे संरक्षण हेच असते..!

जेंव्हा एखादा सडक छाप राजकीय नेता या आपल्या रक्षणकर्त्यांविषयी अपशब्द वापरतो तेंव्हा आपली भारत माता नक्कीच अश्रू ढाळत असेल..! या अशा दृष्टांची हिम्मत होतीच कशी..असे बेताल वक्तव्ये करण्याची..! बहुदा आपल्या भारतीय लोकशाहीतील अमर्याद स्वातंत्र्याचा तो स्वैराचार असावा..! असावा नाही तर आहेच...! आपल्या लोकशाहीला नव्याने बांधणीची गरज निर्माण झाली आहे असे वाटते..!

नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला व स्वतः दिग्दर्शित केलेला नव्वदच्या दशकात एक नितांत सुंदर चित्रपट आला होता..त्याचे नाव होते....प्रहार..! त्यात एक भारतीय जवान ज्यावेळी निवृत्त होतो अन् भारतीय समाज जीवनात मिसळतो..त्यावेळी तो जवान क्षणोक्षणी उद्दिग्न होत असतो..!
का होत असतो तो जवान क्षणोक्षणी उद्दिग्ण...?

त्या जवानांच्या मानसिक उद्दिग्नतेचे  त्याच्या मनातील एकमेव  कारण म्हणजे...
" आम्ही अहोरात्र रक्ताची होळी साजरी करून या समाजजीवनातील भारतीयांना सुखाचे दिवस दिलेत अन् ही माणसं प्रत्यक्ष समाजजीवनात किती गलिच्छ वर्तन करतायेत..!
एका भारतीय निवृत्त जवानाच्या मनातील,वर्तनातील होणाऱ्या घालमेलीचे अचूक सादरीकरण प्रहार चित्रपटात केलेले आहे...! याच आशयाला धरून आमच्या गावातील गणू व माझ्यात एकदा मागे मोबाईल वर असाच संवाद झाला होता..!

खरंच भारतीय सैनिकांची आपल्या भारतीयांना किंमत आहे का..अन् असेल तर ती फक्त एखादा देश भक्तिपर चित्रपट पाहताना किंवा एखादा जवान धारातीर्थी पडतो तेवढ्या काळापुरती मर्यादित होत चालली आहे का..? हा मनाला हेलावून टाकणारा प्रश्न आहे..!

शेवटी एकच....
"तुम ,तुम हो...हम ,हम है..!
तुम नहीं ,तो हम नहीं..!
तुम नहीं तो कुछ भी नहीं..!"

 पून्हा एकदा विनम्र  वंदन  जवानांना....व प्रिय गणू तुला जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा..!

वंदे मातरम्...!

लेखक: नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:२६ सप्टेंबर २०१६
प्रिय गणू व माझ्यातील संवादाची वेळ रात्री ७:१० ते ७:२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा