चिंतन
** नऊ दिवसांच्या नऊ रंगाच्या साड्या..!**
" काहीही हं...! "
______________________________________________
कोणे एकेकाळी हिंदू धर्मातील गरीब, अशिक्षित माणूस ( पुरुष अन् स्री ) अंधश्रध्दा किंवा कोणत्याही प्रथा परंपरा सुरू करण्यात पटाईत होते..असे सुशिक्षित माणसं म्हणत असे..!
पण नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ रंगाच्या साड्या परिधान करणे ही अलीकडच्या काळातील हिंदू धर्मातील सुशिक्षित महिलांनी,सुशिक्षित महिलांच्या करिता सुरू केलेली प्रथा परंपरा..गोर गरीब महिलांना न्यूनगंड निर्माण करायला भाग पाडत आहे..!
नवरात्राच्या नऊ दिवसात नऊ रंगाच्या साड्या परिधान कराव्यात असे कुठेही हिंदू धर्म ग्रंथात उल्लेखित नाही..!
आपल्या वर्तमानपत्राचा खप वाढावा म्हणून महाराष्ट्र टाइम्स विरूध्द लोकसत्ता मध्ये स्पर्धा सुरू झाली अन् त्यांनी त्याद्वारे मार्केटिंग केले नवरात्र व साड्यांचे..! अन् या कामासाठी पद्धतशीरपणे उपयोग करून घेतला सुशिक्षित , पैसे असणाऱ्या महिलांचा.. इ.स.२००३ पासून..!
ता.क.: एखाद्या गोर गरीब महिलेला नऊ रंगाच्या साड्या पैकी एखाद्या रंगाची साडी नऊ दिवसांपैकी एखाद्या दिवशी दान केली तर खरी आई अंबाबाईला ,तुळजाभवानी मातेला वस्र दान केल्याचे आत्मिक समाधान नक्कीच मिळेल..! आम्ही दरवर्षी असे करतो.
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
वंदे मातरम्..!
दिनांक:१०/१०/२०१८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा