🔵प्राचीन भारत, भाग क्रमांक - ६🔵
🛑मगध साम्राज्याचा उदय🛑
=================================
🔴सोळा महाजनपदे🔴
🔶कुरू, पांचाल,शुरसेन, मत्स्य, चेदी, कोसल, काशी,मगध,व्रिजिका,मल्ल,वत्स,अंग,अवंती,अश्मक,
गांधार व कांभोज.
(१) ♦️बिंबिसार ( इ.स.पूर्व ५४३ ते इ.स.पू. ४९१)♦️
◼️बिंबिसार इ.स.पूर्व ५४३ मध्ये गादीवर.
◼️बिंबिसारची पाहिली पत्नी, कोसल राजा प्रसेनजितची बहीण.
◼️गौतम बुद्ध व वर्धमान महावीर या दोघांशी बिंबिसारचे जिव्हाळ्याचे संबंध.
◼️बिंबिसारने बौद्ध धर्म स्वीकारला.
(२) ♦️आजातशत्रू ( इ.स.पूर्व ४९१ ते इ.स.पू. ४५९)♦️
◼️आजातशत्रू हा बिंबिसारचा मुलगा.
◼️कर्तबगार व महत्वकांक्षी.
◼️इ.स.पू. ४५९ मध्ये मरण पावला.
(३) ♦️दर्शक ♦️
◼️आजातशत्रू नंतर त्याचा मुलगा दर्शक याने २४ वर्ष राज्य केले.
(४) ♦️उदयभद्र♦️
◼️दर्शक नंतर त्याचा मुलगा उदयभद्र गादीवर आला.
______________________________________
(१) ♦️शिशुनाग वंश♦️
◼️उदयभद्रची सत्ता शिशुनाग याने बळकावली व शिशुनाग वंशची सत्ता स्थापन केली.
◼️शिशुनागने मगध ची सत्ता बलिष्ठ केली.
(२) ♦️कालाशोक
◼️पाटलीपुत्र परिसरात कालाशोकचा खून होऊन नंद घराणे मगधच्या गादीवर आले.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🛑नंद घराणे🛑
(१) 🔵महापद्मानंद🔵
🔘हा नंद घराण्याचा संस्थापक.
(२) 🔵धनानंद🔵
🔘हा नंद घराण्याचा शेवटचा राजा.
🔘अत्यंत लोभी, जुलूमी,
🔘धनानंद च्या कारकिर्दीत वायव्य भारतावर ग्रीक सम्राट अलेक्झांडर ने इ.स.पू. ३२६ मध्ये आक्रमण केले.
🔘चंद्रगुप्त मौर्य याने वायव्य भारतातील राजे व कौटिल्य ( आर्य चाणक्य ) यांच्या मदतीने धनानंद विरूद्ध लष्करी क्रांती केली.
🔘इ. स. पू.३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य यांच्या हातून नंद घराण्याचा शेवट झाला.
==================================
वंदे मातरम्..!
🔵संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
संकलन व ठळक मुद्दे अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵दिनांक: ९ एप्रिल २०२०, गुरुवार
क्रमशः


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा