शुक्रवार, १६ मे, २०२५

वय होते..


 



#चिंतन ©️


वय होते..


======================


वय होते झुलायचे अन् झुलवायचे


एकमेकांच्या सोबत खोड्या करायचे


हा कोण तो कोण हे कधी शिवलं नाही


एकमेकांशिवाय कधी करमलं नाही ||१||


होता प्रत्येकाचा स्वभाव वेगळा


म्हणून कधी कुणी जाणवला नाही निराळा


कुणी म्हणतं काही दिवस असतात मंतरलेले 


आम्हीच होतो त्यातील आतुरलेले  ||२||


गत आयुष्याला देखील हेवा वाटला असेल


ते आमच्या मैत्रीला बघून खुदकन हसलं असेल


हळुवार वयात होत्या फक्त तीनच वर्ग खोल्या


मात्र त्या संबंध आयुष्याला त्या पुरून उरल्या ||३||


प्रगत अप्रगत या भानगडीत आम्ही पडलो नाही


सगळेच एक सारखे यापेक्षा दुसरं काही जगलो नाही


कमीत कमी गरजातील आम्ही होतो श्रीमंत


खात्रीने सांगतो आमच्या पैकी कुणीही नव्हता संत ||४||


शेणा मातीच्या अभ्यासिकेत अभ्यासही भरपूर केला


एकमेकांना वाचविण्यासाठी सभ्यतेचा आव देखील आणला


आम्ही होतो पौगंडावस्थेतील निशाचर 


तत्कालीन गावातील माहित होते चराचर ||५||


आता फक्त आठवणी आहेत त्या क्षणांच्या 


काहीजणाच्या वर्तमानात नसलेल्या देहाच्या


वर्तमानात प्रत्येकजण स्थिरावला आहे 


आपापल्या आयुष्यात रममाण झाला आहे ||६||


आला दिवस जात आहे 


जाताना आयुष्य घेऊन जात आहे 


हे दयाघना प्रेमात अंतर ठेवू नको


मैत्रीच्या विश्वात अंतर ठेवून जगणं नको ||७||


वंदे मातरम् 


पद्य लेखन - नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव.©️


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


(© सदरील पद्य  लेखन कॉपीराइट केलेले असून पद्य लेखनाचे संपूर्ण हक्क राखून आहेत.)

दिनांक - १६/५/२०२५, शुक्रवार



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा