शुक्रवार, ३० जुलै, २०२१

" दीप अमावस्या..! गटारी अमावस्या नव्हे..!!"



चिंतन


" दीप अमावस्या..! गटारी अमावस्या नव्हे..!!"


===================================


दीप (दिवे धुन्याच्या) अमावस्येला काही विकृत लोक गटारी अमावस्या असे संबोधून हिंदू धर्म बदनाम करत आहे...! मुळात गटारी अमावस्या असा काही सण,उत्सव आपल्या हिंदू धर्मात नाहीये...!

 

गटारी अमावस्या हे नामकरण धूम्रपान करणाऱ्या काही लोकांनी केले आहे...! दीप अमावस्या या दिवशी घरातले सर्व दिवे धुवून त्यांची पूजा केली जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाश देतात. प्रकाश,हा सर्व जाती धर्मातील लोकांच्या आयुष्यातील अंधार दूर करत असतो.त्याच प्रकाशाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उत्सव, दिप अमावस्या..! त्यामुळे ह्या दिवसाला दीप अमावस्याच (दिवे धुन्याची) म्हणावे अगदी चेष्टेने सूद्धा गटारी म्हणू नका..!🙏


कोणीही ह्या दिवशी दारू प्यायला सांगत नाही, उलट दिव्यांची पूजा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगतात...! वेळी च सावध व्हा.. उद्या धूम्रपान करणारे अन् न करणारे देखील काही विकृत माणसं म्हणतील की हिंदू धर्मच आम्हाला गटारी अमावस्या साजरी करायला लावतो, अन् सांगतो की या दिवशी भरपूर दारू प्यावे...!


तेव्हा हिंदू बांधवांनी ह्या दीप अमावस्या विषयी लोकांमध्ये जागृती करून ह्या प्रकाशाच्या उत्सवाला जे विकृत वळण लागले आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करावे, ही विनंती...!🙏


तसेच आपल्या हिंदू धर्माच्या कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा मान राखून दीप अमावास्येला गटारी अमावस्या न म्हणता दीप अमावस्या असेच म्हणावे व आपल्या भारतीय कृतज्ञता व्यक्त करण्याच्या परंपरेचा, सणांचा व संस्कृतीचा मान राखावा..!


त्या पिणाऱ्यांच्या दारू पिण्याविषयी काहीही हरकत नाही..! तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, फक्त गटारी अमावस्या हे नामकरण योग्य नाही हाच मुख्य मुद्दा आहे. 


अंधारावर विजय मिळविणा-या प्रकाशाचे पूजन..दिप अमावस्या या नावाने ओळखले जाते..! आषाढातील अमावास्येला घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांचे पूजन केले जाते..! जे दिवे आपल्या आयुष्यात प्रेरणेचा उजेड देतात,त्याच दिव्यांचे स्वच्छ धुवून पुसून पूजन करण्याचा आजचा पवित्र उत्सव..! 


दिव्यांचे प्रत्येकाच्या आयुष्यात ऋण असते..! हा तोच दिवा असतो, जो प्रकाश देताना जात,पंथ धर्म इ.विविध प्रकारचा भेदभाव अजिबात करत नाही..! दिव्यांच्या प्रकाशाने सर्वजण उजळून निघतात..! त्याच दिव्यांच्या प्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा पवित्र उत्सव... आषाढ अमावस्या दिपपूजा...!


आम्ही पालखेडला असतांना बालपणी श्री.पारेश्वर महादेव मंदिर,संत जनार्दन स्वामी आश्रमात दिपप्रज्वलन करून दिप-पूजन करायचो..! माझी स्व.आई , दरवर्षी,घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची,नंतर चौरंग, किंवा पाटावर सर्व दिवे मांडून त्यांचे पूजन करायची..! त्या निमित्ताने स्व.आईची आज, खूप आठवण आली..! आईच्या स्वर्गवासानंतर आमच्या कुटुंबात ही जबाबदारी अर्थातच माझ्या धर्मपत्नीने सांभाळली आहे..!


ता.क.: जुनाट सवयी एकदम बदलत नसतात,थोडा दम मारावा लागतो..!☺


वंदे मातरम्...!!


नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव पालखेडवाले.


https://jadhavnandan.blogspot.com/?m=1


दिनांक: १७ जूलै २०१७
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा