शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०१९

" आपला इतिहास, भाग-१ " " एक साधी ओळ नाही..!"



चिंतन

" आपला इतिहास, भाग-१ "

"  एक साधी ओळ नाही..!"
________________________________________________   

आपल्या भारताचा इतिहास किती दैदिप्यमान आहे,हे जेंव्हा तो इतिहास आपण उलगड जातो तेंव्हा कळत जाते.आता पर्यंत आपल्याला मोगलकालीन इतिहासाचा थोडा जास्तच over dose विविध पाठ्यपुस्तके,विचारवंत आणि प्रसार माध्यमे इ. द्वारे देण्यात आपले ,शैक्षणिक,कला सांस्कृतिक,राजकीय इ.अनेक क्षेत्रातील मानवी घटकांना धन्यता वाटत आली आहे..! आपल्याला जसजसे भारतीय इतिहासातील अनेक महान भारतीय सम्राट,राजे,महाराणी इ.चे दैदिप्यमान ऐतिहासिक कार्य माहीत होत जाते,तसतसे आपल्या भारतीय पूर्वजांच्या त्यागाचा खूप अभिमान वाटू लागतो..!

आतापर्यंत हा भारतीयांचा दैदिप्यमान इतिहास मोठ्या स्वरूपात का पुढे  येत नाही..किंवा आला नाही..? कोणत्या बुरसटलेल्या मानसिकता हा भारतीय इतिहास मोठ्या स्वरूपात पुढे न येऊ देण्यास कारणीभूत होत्या. किंवा आहेत...? बरं या आपल्या भारताच्या मातीतील जगाला हेवा वाटावा असे सदा सर्वदा वंदनीय ऐतिहासिक स्री,पुरुषांना जर इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात स्थान दिलेच तर..आपल्यातील काहीजण लगेच..टाहो फोडायला सुरुवात करतात की,
" अमके.. अमके इतिहासाचे भगवेकरण करत आहेत..!"
आपल्याच देशातील,आपल्याच लोकांचा भले ते कोणत्याही जाती धर्माचे असोत,त्यांचे पाठ्यपुस्तकात धडे लिहिल्या गेले तर..त्यात कुठे आले..भगवेकरण..?
तो एकच रंगात आपण सर्वांनी आत्मचिंतन करून रंगवायला हवा...अन् तो रंग म्हणजे.. त्या..त्या..महान राष्ट्र सेनानींच्या त्यागाच्या,शौर्याच्या ,आत्मबलीदानाच्या रंगाने..!

इ.६ वी च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात पाठ क्रमांक: ७.
" मौर्यकालीन भारत "  या  पाठात,ज्या अॅलेक्झांडर उपाख्य सिकंदरने  भारत वगळता संपूर्ण जग जिंकले पण त्याला जगज्जेता होण्यापासून, ज्यावेळी अलेक्झांडर ने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी  आपला भारतीय सम्राट पोरस उपाख्य पुरुषोत्तम पुरूच रोखू शकला किंवा प्रयत्न केला. त्यांच्या  कार्या विषयी एक साधी ओळही नाही अन् तथाकथित जगज्जेत्या म्हणविल्या गेलेल्या ग्रीक सम्राट अॅलेक्झांडर विषयी अख्खा एक परिच्छेद,त्याच्या फोटो सह लिहिला गेला आहे. दुर्दैव आपले..! 

खूप अपमानित झाल्या सारखे वाटते मला, तो घटक शिकवितांना..! आपण आपल्याच लोकांचा इतिहास लिहायला व सांगायला कमी पडलो तर कोणत्या तोंडाने आणि नैतिक मूल्यांची जोपासना करून आपली येणारी पिढी तयार होईल..?

आपल्या मातीतील ,आपल्या माणसांचा ,आपल्या भारत देशाच्या रक्षण प्रित्यर्थ केलेला महान त्यागाचा इतिहास व त्या इतिहासातील राष्ट्रपुरुषांच्या कामगिरीचे कार्य पाहून जर उर अभिमानाने भरून येत असेल, आणि अशांचा इतिहास लिहिला तर त्यात कुठले आले भगवेकरण..?
अशा पद्धतीने ओरड करणारे कधी कुणाचे बाहुले झाले,हे त्यांनाच अजूनही समजलेलं नाही..!

नोव्हेंबर २०१७ पासून सोनी चॅनल वर सोमवार ते शुक्रवार दररोज रात्री ८:०० वा.प्रसारित होणारी  " पोरस "ही ऐतिहासिक मालिका पाहतांना , पोरस साम्राज्य,तक्षशिला साम्राज्य यांचा इतिहास पहिल्यांदाच एवढ्या भव्य दिव्य स्वरुपात पाहतांना अनेक माहीत नसलेल्या गोष्टी ज्ञात होत जातात..!भारताच्या शैक्षणिक,कला व सांस्कृतिक,राजकीय व सामाजिक क्षेत्रात भारताच्या प्राचीन इतिहासाला पाहिजे तितके महत्व दिल्या गेले नाही.वास्तविक प्राचीन भारतीय इतिहास,हा आपल्या  भारताच्या इतिहासाचा प्रारंभ म्हंटला तर वावगे ठरणार नाही..! 

प्राचीन भारतीय इतिहासाच्या अनेक महान भारतीय रक्षकांनी देशाप्रती केलेल्या योगदानाचे अनुकरण पुढील ऐतिहासिक पिढी करत राहिली,त्यांच्या पासून प्रेरणा घेत राहिली हे शाश्वत सत्य आहे..!प्राचीन भारतीय इतिहासाच्या पाऊलखुणा पाहतांना भारताचे पहिले रक्षक राजा पुरुषोत्तम उपाख्य पुरू (पोरस) यांचे शौर्यपूर्ण कार्य येणाऱ्या सर्व भारतीय रक्षकांसाठी प्रेरणादायी होते..!त्यांच्या शौर्याचे आदर्शव्रत, त्यानंतर आलेल्या अनेक भारतीय सम्राटांनी अंगीकारले..! या सर्वांचे ध्येय एकच होते...स्वतःचे,स्वतःच्या लोकांसाठी सुराज्य स्थापन करणे..!आणि ते या अनेक थोर सम्राटांनी यशस्वीरीत्या पूर्ण करून सुध्दा दाखविले..! 

मी इतिहास तज्ञ नाही.पण सदरील  हे पाठ्यपुस्तक व त्यातील हा घटक शिकवत असताना ज्या भावना मला सतत जाणवतात त्या विषयी व्यक्त केले आहे हे कृपया सर्व वाचकांनी नम्रपणे समजून घ्यावे ही नम्र अपेक्षा..!
वंदे मातरम्..!

नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

https://jadhavnandan.blogspot.com/?m=1

दिनांक:३० ऑक्टोबर २०१८

क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा