मला प्रवासात भेटलेली माणसं..!
" हजरजबाबी प्रिय मित्र, त्रिभुवन सर..! "
=================================
प्रिय मित्र...! प्रकाश सूर्यभान त्रिभूवन सर शिवराईकर ता. वैजापूर,प्रथमत: तूम्हाला जन्मदिनाच्या मनपूर्वक शूभेच्छा.!
प्रत्येकाच्या आयूष्यात रक्तविरहीत नात्यात ईश्वराने दिलेली अनमोल देणगी म्हणजे मित्र..! त्यातही मित्र जर जिवलग असेल तर ....आयूष्यातील बरेचसे चढ-उतार सपाट जमीनीसारखे वाटायला लागतात.माझ्या नोकरीच्या कालखंडात आतापर्यंत " जिवलग मित्र " या श्रेणीत असणा-या मोजक्या मित्रांपैकी प्रिय मित्र-त्रिभूवन सर..! त्रिभूवन सर,म्हणजे जिंदादिल माणूस..! आयूष्याप्रती कमालीचा सकारात्मक असलेला माणूस..! सदैव प्रसन्नचीत असलेला माणूस..!
त्रिभूवन सरांनी नोकरीला लागण्यापूर्वी आयूष्याला ज्या रितीने मेहनत,जिद्द,स्वकष्ट,शिक्षणातील सातत्य,इ.अनेक मानवी मूल्यांनी सामोरे गेले त्या मूल्यांकडे मी प्रथम पासूनच त्यांना आदराने बघतो..!आम्ही इ.स.१९९६ला शाळेत सहकारी होतो.सर कोणताही वर्ग,कोणताही विषय अगदी सहजरित्या शिकवायचे..! आज आलेला ज्ञानरचनावाद सरांनी १९९६ लाच राबविला होता..! विशेष करून त्रिभूवन सर,इ.१ ली ला शिकवायला होते, तेव्हा त्यांची इ.१ लीच्या वर्गात प्रवेश करतांना Entry अगदी आनंदी मनाने नाचत-नाचत व्हायची..! मला ती त्यांची शैली कमालीची आवडायची..! कारण इ .१ली चा वर्ग बालमनांचा वर्ग..! नूकताच त्या बालकांनी औपचारिक शिक्षणाचा श्रीगणेशा केलेला ..सगळे अनोळखी वातावरण...आणि...या अनोळखी वातावरणात त्रिभूवन सरांचे त्या बालकांप्रती असलेली आनंददायी भूमिका,त्या बालकांना भयमूक्त करायची..! ही बालकांप्रती असलेली निर्भेळ,आनंददायी भूमिका आजही इ.१ली/२रीच्या वर्गशिक्षकांसाठी अनुकरणीय आहे..!
त्रिभूवन सरांचा हजरजबाबीपणात कमालीचा हातखंडा आहे..! कधीही भेट झाली की, सरांकडून हजरजबाबीपणाची शाब्दिक कोटी आजही आवर्जून ऐकायला मिळते..!इ.स.१९९७ -९८ ला मी,नितीन पगार सर सटाणावाले व त्रिभूवन सरानी विविध निवासी प्रशिक्षणात एकांकीका गाजविल्या..! विशेष म्हणजे या एकांकिका आम्ही ऐनवेळेवर प्रसंगनारूप तोंडी तयार करायचो.थोडक्यात संहिता समजावून सांगायचो.अन् मंचावर बरोबर ऐनवेळेवर सूचणा-या संवादानुसार आमच्या एकांकिका त्यावेळी खूप लोकप्रिय झाल्या होत्या..! आम्हाला प्रोत्साहन तत्कालिन गटशिक्षणाधिकारी आदरनिय नारायणराव फाळके साहेबांचे असायचे..! (नंतर आम्ही या एकांकिका बंद केल्या,कारण प्रशासनाकडून आमचा फक्त आणि फक्त वापर व्हायला लागला..!)
त्रिभूवन सरांचे व माझे आजही कौटूंबिक ,जिव्हाळ्याचे संबंध आहेत व राहतील..! मैत्री निभावतांना ज्या-ज्या मूल्यांवर आपले विचार अंतर्मनातून जूळून येतात ,त्यांच्या साहाय्याने मैत्रीचे रोपटे निश्चितच वाढवायला हवे..! कारण मित्र हा न मागता मिळालेला ईश्वरीय प्रसाद असतो..!
आज माझे प्रिय मित्र,त्रिभूवन सरांचा जन्मदिन आहे.त्याबद्दल सरांना आमच्या कूटूंबाकडून मनपूर्वक शूभेच्छा..!
वंदे मातरम्..!
नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
फेसबुकवर लिखाण दिनांक: १५ एप्रिल २०१७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा