" आपले भावविश्व...! "
==================================
माणूस भावनेवर जगणारा व विविध मनोभावनांच्यापायी स्वत:चे भावविश्व फूलविणारा व वेळप्रसंगी उध्वस्त करणारा देखील..सजीव प्रजातीमधील "बहूदा एकमेव प्राणी " आहे. माणसाने आपले भावविश्व गूंतविण्यासाठी स्री,साहित्य,संगीत,कला,क्रिडा,गाणी इ.ची आपआपल्या सोयीनूसार निवड केलेली आपण बघतो. भावनेवर जगणारी माणसे आपली आवड जपण्यासाठी जिवाचा आकांतही करतात. कधी-कधी स्वत:चे भानही विसरतात;आणि एवढं तल्लिनतेनं भावविश्वात जगतो तो माणूसच...!
महेश भट्ट दिग्दर्शित " जख्म " या चित्रपटातील " तुम आए तो आया मुझे याद,गली में आज चाँद निकला..!" या गीतातील भाव अतिशय हृदयाला स्पर्श करून जातात. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या अन् एम. एम. क्रीम यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताचा गोडवा भावूक मनाला सुखावून जातो.
" तुम आए तो आया मुझे याद,गली में आज चाँद निकला..!"
या गीताच्या सुरुवातीला जेंव्हा नागार्जुन ,पूजा भट्ट हिच्या घरी दारात येऊन उभा राहतो,त्यावेळी पूजा भट्ट,नागार्जुन कडे एकटक बघतच राहते. तिच्या त्या पाहण्यातील आनंदी वृत्ती अन् खूप दिवसानंतर भेट झाल्याच्या विरहानंतरचा जाणवणारा भाव,पूजा भट्ट यांनी अप्रतिम अभिनयाद्वारे व्यक्त केला आहे. पूजा भट्ट यांच्या त्या अव्यक्त भावनेला तितकीच अर्थपूर्ण शब्दांनी,संगीताने साथ दिली आहे , त्यामळे हे गाणं भावूक मनांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवून आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण गीतात पूजा भट्ट यांनी जो न बोलताही अप्रतिम अभिनय केला आहे,तो निव्वळ लाजवाब आहे..! फक्त आपल्या देहबोलीतून आपल्या भावनेला अतिशय अत्युत्कृष्ट अभिनयाच्याद्वारे व्यक्त करणे या अभिनयाच्या श्रेणीतील यातील सर्वोत्कृष्ट अभिनय पूजा भट्ट यांनी केलेला आहे.
बऱ्याच लोकांना अजूनही जुनी गाणी ऐकायला आवडतात कारण जुन्या गाण्यांच्या रचना ह्या आपल्या मनातील भावनांशी खूप जास्त प्रमाणात मेळ खातात .आपले मनोविचार ती गाणी प्रगट करत असतात.त्या गाण्यांमध्ये माणूस कधी-कधी स्वत:चे तरूणपण शोधतो..तर कधी-कधी बालपण तर कधी म्हातारपणही..! गाणी माणसाला निरव शांतता मिळवून देते; परंतू ती गाणी,त्यातील नादमाधुर्य व अर्थ मनाला हर्षोल्हासित करणारा असावा. या सर्व बाबी साधारणत: हिंदी किंवा मराठी चित्रपटातील ९०च्या दशकापर्यंत भरभरून पहायला मिळतात.सूधीर फडके,श्रीराम मोघे,जगदिश खेबूडकर,राम कदम,अनिल मोहिले,ग.दि.मा.सूरेश भट ,आनंदघन इ.अनेक मंडळींनी मराठी चित्रपट सृष्टीतील संगितमय व काव्यमय विश्वाला समृध्द केलेल आहे.
हिंदी चित्रपट विश्वातील भावविश्वाला एका वेगळ्या उंचीवर नेणारी माझ्यामते दोन अवलिया माणसे ....गूलजार साहेब व किशोरदा...! तशी अनेक आहेत परंतू ही मंडळी जरा हटकेच...! किशोरदांनी त्यांच्या उभ्या हयातीत प्रौढ,म्हातारे झाले तरी त्यांच्यातील " बालकाला " कधीच मरू दिले नाही.अन् दूसरे सिध्दहस्त लेखीणीचा महाराजा माणूस...गूलजार साहेब...! गूलजारजींच्या प्रत्येक रचनेतील प्रत्येक शब्दात खूप गोड,गंभीर,समर्पक भावार्थ सामावलेला आढळून येतो. एकदा नाना पाटेकरजी व गूलजारजींची एकत्र मूलाखतीचा कार्यक्रम होता.विविध पत्रकार मंडळी हजर होती.नानाजी मूळातच वाचाळ माणूस...! अन् सोबत साक्षात भाषाप्रभू गूलजारजी...! दोघं, दोन टोकांची भावविश्व सांभाळणारी व जपणारी अवलिया माणसं..! या पत्रकार परिषदेत नानांनी विनम्रपणे काहीही मत व्यक्त करायला चक्क नकार दिला. कारण नाना म्हणाले
" इथे मानवीय भावविश्वाला आपल्या रचनेद्वारे समृध्द करणारा देवमाणूस बसलेला असल्यावर मी बोलूच शकत नाही.."
अस म्हणून त्यांनी गूलजारजींकडे माईक सोपविला होता..!
अशी थोर भावनाशील माणसांनी हिदी चित्रपटसृष्टी नटलेली आहे.! गूलजारजी रचित ,जे.पी.दत्ता दिग्दर्शीत " गूलामी " चित्रपटात (माझा सर्वात आवडता चित्रपट आहे) मिथून चक्रवर्ती व अनिताराज वर चित्रित केलेलं एक गाणं आहे. "जिहाले मस्की मुकुंबरंजीश...." वगैरे.. या गाण्यातील सूरूवातीचे शब्द अरेबिक भाषेतील व नंतरचे ऊर्दू मिश्रित हिंदीतील..! या गाण्याचा गोडवा व अर्थ गावा तेवढा थोडाच.! वास्तविक अरेबिक भाषा आपल्याला समजत नाही.तरीही ती रसिक भारतीयांनी भावनेच्या आधारे समजून घेतली व या गाण्याला अजरामर करून टाकले..!
अशी अनेक गाणी आहेत की,जी भावनेवर जगणा-या अनेक भारतीयांना " भारतीय "म्हणून नेहमी एकत्र आणतात. आणि याचं श्रेय जाते वरील उल्लेखित व अनुल्लेखित रसिक भावनाशील थोर व्यक्तिंना...!
ता.क. - " गली में आज चांद निकला " या सुमधुर गाण्याची व्हिडिओ लिंक..! ज्यांना शक्य आहे त्यांनी निवांत ऐका अन् बघा..!! 🙏🏻🎼
https://youtu.be/SOYFHUTZ-kw
वंदे मातरम्..!
एक रसिक : नंदन शोभाबाई विष्णूपंत जाधव.©️
https://jadhavnandan.blogspot.com/?m=1
(© सदरील लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत.)
दिनांक - ३०एप्रिल २०१७

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा