🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २०🛑
🔵आग्नेय आशियाशी संबंध - भाग :५🔵
==================================
🧿 सुमात्रा 🧿
( आजच्या इंडोनेशिया चे बेट )
♦️ श्रीविजय घराणे ♦️
🔘 इंडो चायना या सुवर्ण द्वीपातील सुमात्रा हे सर्वात मोठे बेट होय.प्राचीन काळी त्याचे नाव श्रीविजय होते.
🔘 इसवी सनाच्या चौथ्या शतकात श्रीविजय या हिंदू राज्याची सुमात्रा मध्ये स्थापना झाली.
🔘 चिनी प्रवासी इत्सिंगच्या म्हणण्यानुसार श्रीविजय याची आरमारी शक्ती प्रशंसनीय होती.
🔘 इ. स.६७५ ते ७७५ या शतकातील श्रीविजयच्या राजांनी संपूर्ण मलाया ( मलेशिया ) द्विपकल्पावर आपली अधिसत्ता प्रस्थापित केली.
🔘 इ. स.६८४ मध्ये सुमात्रावर श्रीजयनाग हा बौद्ध धर्मीय राजा राज्य करत होता.
🔘 नालंदा विद्यापीठाचा कुलगुरू धर्मपाल हाही सातव्या शतकात सूमात्रात भेट देऊन गेला.
🔘 शैलेंद्र घराण्याने श्रीविजय सत्ता संपुष्टात आणली.
♦️ शैलेंद्र घराणे ♦️
🔘 इसवी सनाच्या आठव्या शतकात सुमात्रा येथे शैलेंद्र साम्राज्याचा उदय झाला.
🔘 शैलेंद्र राजे महायान पंथीय बौद्ध राजे होते.
🔘 शैलेंद्र राजांनी नागापट्टन,मेघापट्टण, नालंदा येथे विहार बांधले.
🔘 पाल राजा धर्मपाल याचा पुत्र देवपाल यांच्या शिलालेखात उल्लेख येतो.
🔘 शैलेंद्र साम्राज्य आग्नेय आशियातील जावा,सुमात्रा,मलाया , बाली एवढ्या विस्तीर्ण प्रदेशावर पसरले.
🔘 इ. स.१०२५ मध्ये राजेंद्र चोलाच्या आरमाराने शैलेंद्र साम्राज्यावर चढाई केली.संपूर्ण शैलेंद्र साम्राज्यावर राजा चोल यांची सत्ता प्रस्थापित झाली.
==================================
वंदे मातरम्..!
🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.
🔵 संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.
🔵 दिनांक: २९ एप्रिल २०२०, बुधवार.
🔴 आग्नेय आशियाशी संबंध-
क्रमशः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा