शनिवार, २३ मे, २०२०

प्राचीन भारत भाग क्र.२२ ⭕ चालुक्य घराणे ⭕



🛑 प्राचीन भारत,भाग क्रमांक २२🛑

       ⭕ चालुक्य घराणे ⭕

==================================

🧿 बदामीचे चालुक्य घराणे 🧿

१) ♦️ पुलकेशी पहिला ♦️  ( इ.स.५३५ ते ५६६)

🔘विजापूर जिल्ह्यातील बदामी ( प्राचीन वातापी )येथे पुलकेशी पहिला याने राजधानी वसविली.
🔘 याने अश्वमेध यज्ञ केला.

२) ♦️ कीर्तीवर्मन ♦️ ( इ.स.५६७ ते ५९७)

🔘 पुलकेशी पुत्र  कीर्तीवर्मन राजा झाला.
🔘 कीर्तीवर्मन  याने कोकण विजय केला.

३) ♦️ मंगलेश♦️

🔘  कीर्तीवर्मन यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा दुसरा पुलकेशी अल्पवयीन असल्याने  कीर्तीवर्मन यांचा भाऊ चालुक्य घराण्याचा राजा झाला.
🔘 यांच्या काळात बदामी येथे विष्णूचे प्रसिद्ध मंदिर,दगडात कोरण्यात आले.
🔘 अखेर  कीर्तीवर्मन याचा मुलगा दुसरा पुलकेशी वयात आल्यानंतर गादीसाठी चुलत्या- पुरण्यात ( दुसरा पुलकेशी व मंगलेश ) तुंबळ यादवी. त्यात मंगलेश ठार झाला. इसवी सन ६०९ मध्ये दुसरा पुलकेशी सत्तारूढ झाला.

४) ♦️ दुसरा पुलकेशी ♦️ ( इ. स.६०९ ते ६४२)

🔘 प्रदीर्घ काळ राज्य करणारा दुसरा पुलकेशी हा चालुक्य घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होय.
🔘 दुसरा पुलकेशी हा सम्राट हर्षवर्धन यांचा समकालीन होता.
🔘 हा स्वतःला सत्याश्रय, परमेश्वर, पृथ्वीवल्लभ ,परममाहेश्वर ही बिरूद लावत असे.
🔘 याचे साम्राज्य दक्षिण गुजराथ ते थेट वेंगी आणि अरबी समुद्र पासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत  होते.
🔘 इसवी सन ६४२ मध्ये पल्लव राजपुत्र नरसिंहवर्मन यावे दुसरा पुलकेशी याला युध्दात ठार केले.

५)  ♦️ विक्रमादित्य पहिला♦️  ( इ. स.६५५ ते ६८०)

🔘 दुसरा पुलकेशी यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा  विक्रमादित्य पहिला हा चालुक्य घराण्याचा राजा झाला.

६) ♦️विनयादित्य♦️

🔘विक्रमादित्य पहिला यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा विनयदत्त व नातू विजयादत्त यांना सतत पल्लवांशी संघर्ष करावा लागला.

७) ♦️  विक्रमादित्य दुसरा ♦️ ( इ. स.७३३ ते ७४७)

🔘 विजयादत्त यांच्या मृत्यू नंतर त्यांचा मुलगा विक्रमादित्य दुसरा हा चालुक्य घराण्याचा राजा झाला.
🔘 याने पल्लवांची राजधानी कांची लुटली. कांचीच्या कैलासनाथ मंदिरातील एका स्तंभावर विक्रमादित्य दुसरा याने तीनदा कांची जिंकल्याचा कानडी भाषेत लेख कोरविला.
🔘 विक्रमादित्य दुसरा  याने पांड्य व चोळ राजांना पराभूत करून भारताच्या दक्षिण तटावर विजयध्वज उभारला.

८) ♦️  कीर्तीवर्मन  दुसरा ♦️ ( इ. स.७४७ ते ७५३)

🔘  चालुक्याचा मांडलिक असलेला वेरूळचा राजा
' दन्तिदुर्ग ' याने इ. स ७५३ च्या सुमारास कीर्तीवर्मन  दुसरा याचा संपूर्ण पराभव करून बदामीच्या चालुक्य घराण्याची सत्ता संपुष्टात आणली. ह्या नंतर दक्षिणेत राष्ट्रकूट सत्ता प्रबळ झाली.

==================================

🔵 वंदे मातरम्..!

🔵 संदर्भ पुस्तक : " प्राचीन भारत - प्रारंभ ते १२०० "
लेखक : डॉ. धनंजय आचार्य.

🔵 संकलन व अनुलेखन: नंदन शोभाबाई विष्णुपंत जाधव पालखेडवाले.

🔵 दिनांक:  १ मे २०२०, शुक्रवार.

🔴 प्राचीन भारत-
    क्रमशः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा